शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

रस्त्यावरील वाहनांमुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:17 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सुमारे सतरा वर्षांपूर्वी दोन टप्प्यात वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्र मण विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच वाहनांवर नियंत्रण रहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. रस्ता झाल्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे वाटले होते, परंतु काही दिवसांतच ते दिव्य स्वप्नच राहिले. कारण की वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये असून त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन्तास लहान आणि मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वेळेस संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी उलटसुलट चर्चा करीत आहेवाहनतळाची व्यवस्था नाहीवडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नासर्डी नदी पुलालगत, अमृत वर्षा कॉलनी व वनवैभव कॉलनी या ठिकाणी समोरासमोर लॉन्स व मंगल कार्यालय असल्याने विवाह समारंभाच्या दिवशी रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांमुळे जणूकाही वाहतुकीस रस्ता बंद केला जातो. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना कशी परवानगी दिली, असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.रस्त्यावरून पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना लॉन्स व मंगल कार्यालयांना परवानगी दिलीकशी ? असा प्रश्न वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पडला आहे.- अशोक लोळगे, रहिवासी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक