शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

रस्त्यावरील वाहनांमुळे कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 01:17 IST

वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लॉन्स व मंगल कार्यालयांलगत तासन्तास उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी दखल घेऊन तातडीने रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सुमारे सतरा वर्षांपूर्वी दोन टप्प्यात वडाळा नाका ते पाथर्डी गाव असा वडाळा-पाथर्डी नागपूर पॅटर्नचा रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूस व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर पक्के बांधलेले ओटे आणि पत्र्याचे शेड हे रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्र मण विभागाने जमीनदोस्त केली. त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले. तसेच वाहनांवर नियंत्रण रहावे आणि समोरासमोर अपघात होऊ नये म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकण्यात आले. त्या दुभाजकांमध्ये खजूर व शोभिवंत वृक्ष लावण्यात आल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. रस्ता झाल्यामुळे वाहतुकीची समस्या सुटेल, असे वाटले होते, परंतु काही दिवसांतच ते दिव्य स्वप्नच राहिले. कारण की वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच दहा ते बारा लॉन्स व मंगल कार्यालये असून त्यांच्याकडे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने ज्या दिवशी विवाह सोहळा असतो त्यादिवशी रस्त्यावरच तासन्तास लहान आणि मोठी वाहने उभी राहतात. त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांतील नागरिकांना आणि रस्त्यालगत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच अनेक वेळेस लहान-मोठे अपघात घडतात. अनेक वेळेस संबंधित विभागाला निवेदन आणि समक्ष भेटून तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी उलटसुलट चर्चा करीत आहेवाहनतळाची व्यवस्था नाहीवडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नासर्डी नदी पुलालगत, अमृत वर्षा कॉलनी व वनवैभव कॉलनी या ठिकाणी समोरासमोर लॉन्स व मंगल कार्यालय असल्याने विवाह समारंभाच्या दिवशी रस्त्यावर उभ्या राहणाºया वाहनांमुळे जणूकाही वाहतुकीस रस्ता बंद केला जातो. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना कशी परवानगी दिली, असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे.रस्त्यावरून पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना मार्गक्र मण करणे जिकिरीचे झाले आहे. संबंधित विभागाने वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसताना लॉन्स व मंगल कार्यालयांना परवानगी दिलीकशी ? असा प्रश्न वाहनधारकांना तसेच परिसरातील नागरिकांना पडला आहे.- अशोक लोळगे, रहिवासी

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक