शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:28 IST

खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला : दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा वसुली; सोसायट्या अडचणीत

बाजीराव कमानकर ।सायखेडा : खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात होते आणि खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. या हंगामातील पेरणी करावयाची पिके आणि नगदी पिके यांच्यासाठी मुबलक भांडवल असेल तर शेतकरी शेतात चांगल्या प्रकारचे पीक उभे करू शकतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांची अर्थवाहिनी असणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली. यामुळे जिल्हा बँकेच्या पतपुरवठ्यावर उभे असणाºया गावागावांतील सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. जवळपास ९० टक्के शेतकºयांना कर्जपुरवठा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. फुले कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकºयांच्या खात्यात पैसे वर्ग करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शासनाने महात्मा फुले कृषी सन्मान योजना सुरू करून दोन लाख रु पयांच्या आत कर्ज असणाºया शेतकºयांचे कर्ज माफ केले, मात्र या कर्ज खात्यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारची रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टीने कर्जमाफी झालेले शेतकरी मात्र बँकेच्या दप्तरी कर्जदार दिसत आहेत. त्यामुळे बँकेकडून नवीन कर्ज, पीककर्ज मिळत नसल्याने खरीप हंगामाच्यासुरु वातीलाच शेतकरी अडचणीत सापडले आहेत.४अनेक शेतकरी कृषी उद्योग-व्यवसाय करणाºया दुकानदारांकडून बी-बियाणे, खते, औषधे काही दिवसांच्या बोलीवर उधारीत घेतात. मात्र उधारीवर माल देताना दुकानदार शेतकºयांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे वसूल करतात, त्यामुळे पिकासाठी होणारा खर्च वाढतो. पिकांसाठी लागणारे भांडवल फेडताना शेतकºयांच्या नाकीनव येते.महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा कृषी सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रु पये कर्ज असणाºया शेतकºयांना कर्जमाफी दिली. पात्र असणाºया शेतकºयांच्या खात्यात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे पैसे वर्ग झाले नाही, त्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज कोणत्याच बँकांकडून मिळत नाही. शेतकºयांना तत्काळ पीककर्ज मिळावे.- गोकुळ गिते, माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगावखरीप हंगामातील पेरणी करावयाच्या पिकांची तसेच नगदी पिकांच्या लागवडीचा हा काळ असून, यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकºयांना लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना पतपुरवठा करणाºया सहकारी सोसायट्या आणि जिल्हा बँक अडचणीत असल्याने त्यांच्याकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे सुधारित दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये बियाणे, खते खरेदी करावी लागतात.- सुरेश कमानकर, शेतकरी, भेंडाळी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी