शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज मिळत नसल्याने खरिपाच्या भांडवलाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:28 IST

खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी मेटाकुटीला : दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा वसुली; सोसायट्या अडचणीत

बाजीराव कमानकर ।सायखेडा : खरिपाच्या तोंडावर पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भांडवलाची चिंता भेडसावू लागली आहे, त्यातच दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा प्रमाणात वसुली होत असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात होते आणि खरीप हंगामातील पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होते. या हंगामातील पेरणी करावयाची पिके आणि नगदी पिके यांच्यासाठी मुबलक भांडवल असेल तर शेतकरी शेतात चांगल्या प्रकारचे पीक उभे करू शकतो, मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांची अर्थवाहिनी असणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आली. यामुळे जिल्हा बँकेच्या पतपुरवठ्यावर उभे असणाºया गावागावांतील सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. जवळपास ९० टक्के शेतकºयांना कर्जपुरवठा होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. फुले कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकºयांच्या खात्यात पैसे वर्ग करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.शासनाने महात्मा फुले कृषी सन्मान योजना सुरू करून दोन लाख रु पयांच्या आत कर्ज असणाºया शेतकºयांचे कर्ज माफ केले, मात्र या कर्ज खात्यावर शासनाकडून कोणत्याही प्रकारची रक्कम प्राप्त झाली नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टीने कर्जमाफी झालेले शेतकरी मात्र बँकेच्या दप्तरी कर्जदार दिसत आहेत. त्यामुळे बँकेकडून नवीन कर्ज, पीककर्ज मिळत नसल्याने खरीप हंगामाच्यासुरु वातीलाच शेतकरी अडचणीत सापडले आहेत.४अनेक शेतकरी कृषी उद्योग-व्यवसाय करणाºया दुकानदारांकडून बी-बियाणे, खते, औषधे काही दिवसांच्या बोलीवर उधारीत घेतात. मात्र उधारीवर माल देताना दुकानदार शेतकºयांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे वसूल करतात, त्यामुळे पिकासाठी होणारा खर्च वाढतो. पिकांसाठी लागणारे भांडवल फेडताना शेतकºयांच्या नाकीनव येते.महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा कृषी सन्मान योजनेअंतर्गत दोन लाख रु पये कर्ज असणाºया शेतकºयांना कर्जमाफी दिली. पात्र असणाºया शेतकºयांच्या खात्यात मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे पैसे वर्ग झाले नाही, त्यामुळे त्यांना नवीन पीककर्ज कोणत्याच बँकांकडून मिळत नाही. शेतकºयांना तत्काळ पीककर्ज मिळावे.- गोकुळ गिते, माजी संचालक, बाजार समिती, पिंपळगावखरीप हंगामातील पेरणी करावयाच्या पिकांची तसेच नगदी पिकांच्या लागवडीचा हा काळ असून, यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल शेतकºयांना लागते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकºयांना पतपुरवठा करणाºया सहकारी सोसायट्या आणि जिल्हा बँक अडचणीत असल्याने त्यांच्याकडून कर्ज मिळत नाही. त्यामुळे सुधारित दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणामध्ये बियाणे, खते खरेदी करावी लागतात.- सुरेश कमानकर, शेतकरी, भेंडाळी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी