शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

औषधांची वाहने अडकून पडल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:06 IST

नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात.

ठळक मुद्देसंचारबंदीमुळे औषधांचे ट्रक प्रवासातच थांबलेले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : कोरोनाचा धोका वाढला असतानाच नाशिक शहरात व जिल्ह्यात औषधांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. घाऊक विक्रेते असलेल्या गोळे कॉलनीतही स्टाक मर्यादित आहे. देशभर लाकडाउन व संचारबंदी लागू आहे. औषधांचे ट्रक दुसऱ्या राज्यात व जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. सरकारने त्यांना परवानगी दिलेली असली तर वाहतूक संघटना, ट्रकचालक धोका पत्करण्यास तयार नाहीत.

नाशिकरोडच्या औषध विक्रेत्यांनी सांगितले की, नाशिकमध्ये दिल्ली, कर्नाटक, हरयाना, पंजाब आदी राज्यांमधून तसेच मुंबई, पुणे, अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमधून एसटी, ट्रक आणि खासगी वाहनाने औषधांचे पार्सल येतात. हा माल ठक्कर बाजाराला येतो. मात्र, एसटी वाहतूक व कार्यालय बंद असल्याने माल सोडवता आलेला नाही. हरियाना व पंजाबमधील व्हीआरएल, गती, टीसीआय एक्स्प्रेस या ट्रान्सपोर्ट कंपन्या औषधे व जीवनावश्यक माल पाठवितात. मात्र, कोरोनामुळे जारी केलेल्या संचारबंदीमुळे औषधांचे ट्रक प्रवासातच थांबलेले आहेत. सध्या सॅनिटायझर, मास्क, कफ सिरफ, पॅरासिटॅमाल, क्लोरिक्वीन, हायड्रो क्लोरीक्वीन, संसर्गाला प्रतिबंध करणारी औषधांना मागणी वाढली आहे. नेमका हाच माल अडकून पडलेला आहे. सध्याची औषधे व माल जास्तीत जास्त दोन दिवस चालेल, नंतर औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. घाऊक औषध विक्रेते असलेल्या नाशिकच्या गोळे कॉलनीतही अशीच स्थिती आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. सध्याच्या आणीबाणीच्या काळात औषध कंपन्या चालू ठेवाव्यात असे सरकारचे धोरण आहेत. संचारबंदीतून औषध व अन्य जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीला सूट देण्यात आलेली असली तरी अंमलबजावणी होत नाही. मालवाहतूक संघटना धोका घेण्यास तयार नाहीत. त्यांना पोलीस संरक्षण हवे आहे. नाशिकरोडला किरकोळ व घाऊन मिळून दोनशेच्यावर औषध विक्रीची दुकाने आहेत. त्यांनाही औषध टंचाईची समस्या येऊ शकते. मास्क, सॅनिटायझर, संसर्गजन्य औषधांची मागणी सध्या जास्त आहे. हा माल नसल्यामुळे ग्राहक निराश होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक