शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

खामखेडा परिसरात चिंता

By admin | Updated: February 11, 2015 23:32 IST

खामखेडा परिसरात चिंता

खामखेडा : बेमोसमी पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावल्याने खामखेडा परिसरातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. चालू वर्षी बेमोसमी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात खामखेडा परिसरात काही ठिकाणी पाऊस झाला होता. तेव्हा कांद्याच्या रोपांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात परत वातावरणात बदल होऊन तुरळक पाऊस झाला होता, तेव्हा लागवड केलेल्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करुन पिके वाचवली होती. त्यास पंधरा-वीस दिवस झाले नाही तोच मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतातील काढणीस आलेला व शेतात काढून ठेवलेला रांगडा कांदा भिजला. आता गहू, हरभरा उन्हाळी कांदा ही पिके जोमात आहेत. परंतु बेमोसमी पावसामुळे गहू पिकावर तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाटे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या हरभऱ्यावर अळया पडून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उन्हाळी कांद्याची उशिरा लागवड झाल्यामुळे पीक जोमात असले तरी पावसामुळे कांद्याची पात पिवळी पडून करपा रोग पडून कांदा चाळीत टिकणार नाही, तसेच कांदा बियाण्याचे डोंगळे आता बियाणे दाणे भरण्याचे मोसमात आहे, पंरतु या पावसामुळे फुलोरा गळून बियाण्यात घट निर्माण होऊन पुन्हा मागच्या वर्षीसारखी बियाणे टंचाई निर्माण होईल की काय, हा प्रश्न आता शेतकऱ्याला सतावत आहे. (वार्ताहर)