शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नाशिकच्या एचएएलची भविष्यातील कामाची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:08 IST

शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

ठळक मुद्देसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देतात आश्वासन निर्मला सीतारामन यांनी मात्र बाळगले मौन

संजय पाठक, नाशिक :केंद्र सरकारच्या नवरत्न उद्योगांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आता फक्त वर्षभर पुरेल इतकेच सुखोईचे काम शिल्लक आहे. नवीन विमानांचे काम हातून निसटले आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडून कोणतीही अपेक्षा शिल्लक नाही अशा विवंचना असताना नुकत्याच नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर पूर्णत: मौन बाळगल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता अधिक वाढू लागली आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी नाशिककरांना भेट म्हणून दिलेला ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एचएएलच्या अन्य कारखान्यांप्रमाणेच नाशिकलादेखील महत्त्व आहे. मिगसारख्या लढावू विमानाबरोबरच अन्य उपयुक्त कामे करणाऱ्या या कारखान्याकडे सध्या सुखोई विमानाचे देखभाल-दुरुस्तीचे काम आहे. मात्र हे काम पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. यामुळे पुढे काय, असा प्रश्न येथील सुमारे पाच हजार कामगारांना पडला आहे. अर्थात, त्यामागे विविध कारणे आहेत.विद्यमान केंद्र सरकारने खासगीकरणाचा सूर आळवला आहे. तो स्वाभाविक असला तरी एचएएलकडे इतके दुर्लक्ष होईल असे वाटले नव्हते. मात्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एके ठिकाणी सावर्जनिक उद्योग हे शेवट होण्यासाठीच असतात असे विधान केल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे असून, तेव्हापासूनच कामगार वर्गात अस्वस्थता आहे. एचएएलची क्षमता बघता पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचे काम याच उद्योगाला मिळणार हे अटळ मानले जात असताना पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाची हाक दिली आणि राफेल या लढाऊ विमानांचे काम अंबानी यांच्याकडे गेले. त्यामुळे एचएएलला मोठा धक्का बसला आहे.खरे तर राफेलचा निर्णय होण्याच्या अगोदरपासून एचएएलच्या कामगार संघटना केंद्र सरकारकडे विविध मार्गाने काम मागत होत्या. मात्र, एचएएलला रिकामे बसू देणार नाही, असे सांगत वेळकाढूपणा केला गेला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या धुळे मतदारसंघालगतचा हा भाग असल्याने त्यांनी त्याचाही हवाला वेळोवेळी दिला; परंतु उपयोग झाला नाही. मध्यंतरी तर एका कार्यशाळेच्या वेळी कर्मचारी संघटनांनी त्याचा निषेधही केला, परंतु तरीही सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही.कोणतेही नवीन विमान बांधणीचे काम करायचे असेल तर त्यासाठी तांत्रिक सुविधा आणि सज्जतेसाठी पाच ते सात वर्षे कालावधी लागतो. सरकारने आत्ताच ही तयारी केली असती तर दोन-पाच वर्षांत सारे स्थिरसावर होऊन नवीन विमानाचे उत्पादन सुरू होऊ शकेल. परंतु आता सुखोईच्या देखभालीचे काम पुढील वर्षी संपेल अशी स्थिती असतानाही नवीन कामांची घोषणा मात्र केली जात नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

टॅग्स :NashikनाशिकCentral Governmentकेंद्र सरकारRafale Dealराफेल डील