शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नाशिकच्या एचएएलची भविष्यातील कामाची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:08 IST

शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

ठळक मुद्देसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देतात आश्वासन निर्मला सीतारामन यांनी मात्र बाळगले मौन

संजय पाठक, नाशिक :केंद्र सरकारच्या नवरत्न उद्योगांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आता फक्त वर्षभर पुरेल इतकेच सुखोईचे काम शिल्लक आहे. नवीन विमानांचे काम हातून निसटले आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडून कोणतीही अपेक्षा शिल्लक नाही अशा विवंचना असताना नुकत्याच नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर पूर्णत: मौन बाळगल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता अधिक वाढू लागली आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी नाशिककरांना भेट म्हणून दिलेला ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एचएएलच्या अन्य कारखान्यांप्रमाणेच नाशिकलादेखील महत्त्व आहे. मिगसारख्या लढावू विमानाबरोबरच अन्य उपयुक्त कामे करणाऱ्या या कारखान्याकडे सध्या सुखोई विमानाचे देखभाल-दुरुस्तीचे काम आहे. मात्र हे काम पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. यामुळे पुढे काय, असा प्रश्न येथील सुमारे पाच हजार कामगारांना पडला आहे. अर्थात, त्यामागे विविध कारणे आहेत.विद्यमान केंद्र सरकारने खासगीकरणाचा सूर आळवला आहे. तो स्वाभाविक असला तरी एचएएलकडे इतके दुर्लक्ष होईल असे वाटले नव्हते. मात्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एके ठिकाणी सावर्जनिक उद्योग हे शेवट होण्यासाठीच असतात असे विधान केल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे असून, तेव्हापासूनच कामगार वर्गात अस्वस्थता आहे. एचएएलची क्षमता बघता पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचे काम याच उद्योगाला मिळणार हे अटळ मानले जात असताना पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाची हाक दिली आणि राफेल या लढाऊ विमानांचे काम अंबानी यांच्याकडे गेले. त्यामुळे एचएएलला मोठा धक्का बसला आहे.खरे तर राफेलचा निर्णय होण्याच्या अगोदरपासून एचएएलच्या कामगार संघटना केंद्र सरकारकडे विविध मार्गाने काम मागत होत्या. मात्र, एचएएलला रिकामे बसू देणार नाही, असे सांगत वेळकाढूपणा केला गेला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या धुळे मतदारसंघालगतचा हा भाग असल्याने त्यांनी त्याचाही हवाला वेळोवेळी दिला; परंतु उपयोग झाला नाही. मध्यंतरी तर एका कार्यशाळेच्या वेळी कर्मचारी संघटनांनी त्याचा निषेधही केला, परंतु तरीही सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही.कोणतेही नवीन विमान बांधणीचे काम करायचे असेल तर त्यासाठी तांत्रिक सुविधा आणि सज्जतेसाठी पाच ते सात वर्षे कालावधी लागतो. सरकारने आत्ताच ही तयारी केली असती तर दोन-पाच वर्षांत सारे स्थिरसावर होऊन नवीन विमानाचे उत्पादन सुरू होऊ शकेल. परंतु आता सुखोईच्या देखभालीचे काम पुढील वर्षी संपेल अशी स्थिती असतानाही नवीन कामांची घोषणा मात्र केली जात नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

टॅग्स :NashikनाशिकCentral Governmentकेंद्र सरकारRafale Dealराफेल डील