शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नाशिकच्या एचएएलची भविष्यातील कामाची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:08 IST

शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

ठळक मुद्देसंरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे देतात आश्वासन निर्मला सीतारामन यांनी मात्र बाळगले मौन

संजय पाठक, नाशिक :केंद्र सरकारच्या नवरत्न उद्योगांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आता फक्त वर्षभर पुरेल इतकेच सुखोईचे काम शिल्लक आहे. नवीन विमानांचे काम हातून निसटले आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारकडून कोणतीही अपेक्षा शिल्लक नाही अशा विवंचना असताना नुकत्याच नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विषयावर पूर्णत: मौन बाळगल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता अधिक वाढू लागली आहे.

यशवंतराव चव्हाण यांनी नाशिककरांना भेट म्हणून दिलेला ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा कारखाना हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एचएएलच्या अन्य कारखान्यांप्रमाणेच नाशिकलादेखील महत्त्व आहे. मिगसारख्या लढावू विमानाबरोबरच अन्य उपयुक्त कामे करणाऱ्या या कारखान्याकडे सध्या सुखोई विमानाचे देखभाल-दुरुस्तीचे काम आहे. मात्र हे काम पुढील वर्षी संपुष्टात येणार आहे. यामुळे पुढे काय, असा प्रश्न येथील सुमारे पाच हजार कामगारांना पडला आहे. अर्थात, त्यामागे विविध कारणे आहेत.विद्यमान केंद्र सरकारने खासगीकरणाचा सूर आळवला आहे. तो स्वाभाविक असला तरी एचएएलकडे इतके दुर्लक्ष होईल असे वाटले नव्हते. मात्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एके ठिकाणी सावर्जनिक उद्योग हे शेवट होण्यासाठीच असतात असे विधान केल्याचे कामगार संघटनेचे म्हणणे असून, तेव्हापासूनच कामगार वर्गात अस्वस्थता आहे. एचएएलची क्षमता बघता पाचव्या पिढीतील लढाऊ विमानांचे काम याच उद्योगाला मिळणार हे अटळ मानले जात असताना पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाची हाक दिली आणि राफेल या लढाऊ विमानांचे काम अंबानी यांच्याकडे गेले. त्यामुळे एचएएलला मोठा धक्का बसला आहे.खरे तर राफेलचा निर्णय होण्याच्या अगोदरपासून एचएएलच्या कामगार संघटना केंद्र सरकारकडे विविध मार्गाने काम मागत होत्या. मात्र, एचएएलला रिकामे बसू देणार नाही, असे सांगत वेळकाढूपणा केला गेला. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या धुळे मतदारसंघालगतचा हा भाग असल्याने त्यांनी त्याचाही हवाला वेळोवेळी दिला; परंतु उपयोग झाला नाही. मध्यंतरी तर एका कार्यशाळेच्या वेळी कर्मचारी संघटनांनी त्याचा निषेधही केला, परंतु तरीही सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही.कोणतेही नवीन विमान बांधणीचे काम करायचे असेल तर त्यासाठी तांत्रिक सुविधा आणि सज्जतेसाठी पाच ते सात वर्षे कालावधी लागतो. सरकारने आत्ताच ही तयारी केली असती तर दोन-पाच वर्षांत सारे स्थिरसावर होऊन नवीन विमानाचे उत्पादन सुरू होऊ शकेल. परंतु आता सुखोईच्या देखभालीचे काम पुढील वर्षी संपेल अशी स्थिती असतानाही नवीन कामांची घोषणा मात्र केली जात नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी (दि.९) देवळाली येथे नवीन तोफांच्या हस्तांतरणासाठी नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून काही तरी भूमिका जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र त्यांनी भूमिका तर मांडली नाहीच शिवाय पत्रकार परिषदेत एचएचएलच्या विषयावर बोलणेही टाळले. त्यामुळे अस्वस्थता आणि अस्थिरता कायम आहे. ती दूर कधी होणार हे मात्र स्पष्ट नाही.

टॅग्स :NashikनाशिकCentral Governmentकेंद्र सरकारRafale Dealराफेल डील