शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

By admin | Updated: March 23, 2015 23:34 IST

प्रतीक्षा मदतीची : सर्वाधिक नुकसान बागलाणमध्ये

 नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी सलग चार दिवस जिल्ह्यांत हजेरी लावणारा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या २२ हजारांहून अधिक हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पंचनामे करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना प्रचंड धावपळ करावी लागली. एकीकडे दररोज कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे शासनाचा पंचनामे तत्काळ करण्याच्या फतव्यामुळे यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. एकाच शेतात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे वारंवार पंचनामे करण्याची, तर काही शेतामधील पूर्ण पीकच नष्ट झाल्याने पंचनामे तरी काय करणार, असा प्रश्न पडत होता. अशाही परिस्थितीत चार दिवस सलग पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पंचनामे करताना ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात यावेत, तसेच नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्र अथवा ध्वनिचित्रफीत काढण्यात यावी, त्याचबरोबर पंचनाम्यावर शेतमालकाची स्वाक्षरी घेण्याचेही बंधनकारक केल्याने पंचनामे करण्यासाठी यंत्रणेला दहा दिवसांचा कालावधी लागला.  त्यात जिल्ह्णातील बारा तालुक्यांतील ३८६ पैकी ३३७ गावांमधील ४५ हजार २०३ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यात २२ हजार ७४० हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाने बाधा पोहोचली आहे. जिल्ह्णात सर्वाधिक पिकाचे नुकसान बागलाण तालुक्यात झाले असून, २२ गावांपैकी एकाच गावातील ३३७१ शेतकऱ्यांचे पंचनामे केले असता, २९०७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अन्य २१ गावांचे पंचनामे अद्याप शिल्लक असल्याने या तालुक्याचे नुकसान वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सर्वात कमी नुकसान कळवण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील २६ गावांना अवकाळी पावसाने फटका बसला; परंतु २१६ शेतकऱ्यांच्या फक्त ८२ हेक्टर पिकावरच त्याचा परिणाम झाला आहे.