शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

By admin | Updated: March 23, 2015 23:34 IST

प्रतीक्षा मदतीची : सर्वाधिक नुकसान बागलाणमध्ये

 नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी सलग चार दिवस जिल्ह्यांत हजेरी लावणारा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या २२ हजारांहून अधिक हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पंचनामे करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना प्रचंड धावपळ करावी लागली. एकीकडे दररोज कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे शासनाचा पंचनामे तत्काळ करण्याच्या फतव्यामुळे यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. एकाच शेतात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे वारंवार पंचनामे करण्याची, तर काही शेतामधील पूर्ण पीकच नष्ट झाल्याने पंचनामे तरी काय करणार, असा प्रश्न पडत होता. अशाही परिस्थितीत चार दिवस सलग पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पंचनामे करताना ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात यावेत, तसेच नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्र अथवा ध्वनिचित्रफीत काढण्यात यावी, त्याचबरोबर पंचनाम्यावर शेतमालकाची स्वाक्षरी घेण्याचेही बंधनकारक केल्याने पंचनामे करण्यासाठी यंत्रणेला दहा दिवसांचा कालावधी लागला.  त्यात जिल्ह्णातील बारा तालुक्यांतील ३८६ पैकी ३३७ गावांमधील ४५ हजार २०३ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यात २२ हजार ७४० हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाने बाधा पोहोचली आहे. जिल्ह्णात सर्वाधिक पिकाचे नुकसान बागलाण तालुक्यात झाले असून, २२ गावांपैकी एकाच गावातील ३३७१ शेतकऱ्यांचे पंचनामे केले असता, २९०७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अन्य २१ गावांचे पंचनामे अद्याप शिल्लक असल्याने या तालुक्याचे नुकसान वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सर्वात कमी नुकसान कळवण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील २६ गावांना अवकाळी पावसाने फटका बसला; परंतु २१६ शेतकऱ्यांच्या फक्त ८२ हेक्टर पिकावरच त्याचा परिणाम झाला आहे.