शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST

पथदिवे बंद असल्याने गैरसोय नाशिक : गांधीनगर मार्केट परिसरातील काही पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. या ...

पथदिवे बंद असल्याने गैरसोय

नाशिक : गांधीनगर मार्केट परिसरातील काही पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. या परिसरात सायंकाळच्यावेळी बाजार भरतो. परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी भाजी खरेदीसाठी येतात. अंधारामुळे त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. स्थानिक नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील विक्रेत्यांसह नागरिकांनी केली आहे.

शहरातील उद्यानांची दुरवस्था

नाशिक : शहरातील विविध भागातील उद्यानांची दुरवस्था झाली असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचला आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे. यामुळे लहान मुलांना या ठिकाणी खेळण्यास जाता येत नाही. महापालिकेने उद्यानांची स्वच्छता करून खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

गांधीनगरमधील रस्ते दुरुस्तीची मागणी

नाशिक : गांधीनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. परिसरातील अनेक नागरिक सायंकाळच्यावेळी या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांमुुळे त्यांना पायी चालणेही कठीण होते. या परिसरातील किमान रहदारीच्या रस्त्यांची तरी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार

नाशिक : नाशिकरोड परिसरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

भुरट्या चोऱ्या वाढल्याने चिंता

नाशिक : शहर परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. किरकोळ चोऱ्यांची दखल घेतली जात नसल्याने या चोरट्यांचे फावते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून भुरट्या चोरांना आळा घालावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

भाजी विक्रेत्यांची दुचाकीला पसंती

नाशिक : भाजीविक्रीसाठी चारचाकी हातगाडीबरोबरच आता विक्रेत्यांकडून रिक्षा आणि दुचाकीला पसंती दिली जात आहे. अनेक विक्रेते दुचाकीला प्लास्टिक क्रेट बांधून भाजी विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. यामुळे श्रम व वेळ वाचतो. त्याचबरोबर दरराजे नवनवीन भागात जाता येते, असे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले. काही विक्रेत्यांनी रिक्षाला आकार देवून भाजी विक्रीची व्यवस्था केली आहे.

मोकळ्या पटांगणांवर पोलिसांची गस्त

नाशिक : उपनगर, गांधीनगरमधील मोकळ्या मैदानांवर सायंकाळच्यावेळी होणाऱ्या मद्यपींच्या गर्दीला अटकाव करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील मोकळ्या पटांगणांत पोलिसांची गस्त वाढली आहे. यामुळे अनेक मद्यपींचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत केले जात आहे. पोलिसांनी वारंवार या भागात गस्त घालावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी वाढली

नाशिक : लॉकडाऊननंतर हळूहळू परिसरात सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या वाढली असून या कार्यक्रमांना नागरिकांची उपस्थिती वाढली आहे. अनेक विवाहसोहळे आणि इतर घरगुती कार्यक्रमांमध्येही पाहुण्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

चौकांमध्ये रंगू लागली निवडणुकीची चर्चा

नाशिक : पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांची शहर व परिसरात चर्चा होऊ लागली आहे. चौकाचौकांतील कट्ट्यांवर यासंदर्भात आडाखे बांधले जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. आपल्या भागातील इच्छुक, त्यांची तयारी, पैसा, पक्ष अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रत्येकजण तावातावाने बोलताना दिसतो.

तपोवन रस्त्यावर गर्दी वाढली

नाशिक : तपोवन रस्त्यावर सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. निसर्गरम्य वातावरण आणि वाहनांची मर्यादित संख्या यामुळे अनेकांना सकाळी या परिसरात फिरण्याचा मोह होतो. यामुळे दिवसेंदिवस या परिसरात गर्दी वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.