शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:37 IST

मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर येथील ज्येष्ठ नागरिकांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून गाऱ्हाणे मांडले आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठांचा पुढाकार : ह्यमन की बातह्णमधील मुद्यावर भर

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या भिंतीतून गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवर अकरा ठिकाणी पाणी गळती होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. शहरातील पाणी गळती थांबिवण्यात यावी, यासाठी येथील ज्येष्ठ नागिरक नागरी सुविधा संघर्ष समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने ८ फेब्रुवारी रोजी समितीच्या वतीने पालिका प्रवेशद्वार समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ही पालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही.कार्यवाहीची मागणीनुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व पटवून जलसंधारणाचे आवाहन केले. प्रधानमंत्री पाण्याची एवढी काळजी घेतात तर पालिका अधिकारी का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करत समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणीही पंतप्रधानांना करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव एस. एम. भाले यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater transportजलवाहतूक