शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:37 IST

मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर येथील ज्येष्ठ नागरिकांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून गाऱ्हाणे मांडले आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठांचा पुढाकार : ह्यमन की बातह्णमधील मुद्यावर भर

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या भिंतीतून गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवर अकरा ठिकाणी पाणी गळती होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. शहरातील पाणी गळती थांबिवण्यात यावी, यासाठी येथील ज्येष्ठ नागिरक नागरी सुविधा संघर्ष समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने ८ फेब्रुवारी रोजी समितीच्या वतीने पालिका प्रवेशद्वार समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ही पालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही.कार्यवाहीची मागणीनुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व पटवून जलसंधारणाचे आवाहन केले. प्रधानमंत्री पाण्याची एवढी काळजी घेतात तर पालिका अधिकारी का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करत समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणीही पंतप्रधानांना करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव एस. एम. भाले यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater transportजलवाहतूक