शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

मनमाडच्या पाणी गळतीबाबत थेट पंतप्रधानांकडे गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:37 IST

मनमाड : नुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिसापेक्षाही पाणी महत्त्वाचे असल्याचे सांगून जलसंधारणाबाबत आवाहन केले होते. मात्र, मनमाड शहरातील पाणी गळतीबाबत ज्येष्ठ नागरिक सुविधा संघर्ष समितीच्या वतीने वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर येथील ज्येष्ठ नागरिकांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून गाऱ्हाणे मांडले आहे.

ठळक मुद्दे ज्येष्ठांचा पुढाकार : ह्यमन की बातह्णमधील मुद्यावर भर

मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणाच्या भिंतीतून गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी गळती होत आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवर अकरा ठिकाणी पाणी गळती होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाड शहरात पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. शहरातील पाणी गळती थांबिवण्यात यावी, यासाठी येथील ज्येष्ठ नागिरक नागरी सुविधा संघर्ष समितीच्या वतीने पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नसल्याने ८ फेब्रुवारी रोजी समितीच्या वतीने पालिका प्रवेशद्वार समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर ही पालिका प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही.कार्यवाहीची मागणीनुकत्याच झालेल्या ह्यमन की बातह्ण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व पटवून जलसंधारणाचे आवाहन केले. प्रधानमंत्री पाण्याची एवढी काळजी घेतात तर पालिका अधिकारी का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित करत समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून गाऱ्हाणे मांडले आहे. याबाबत आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी, अशी मागणीही पंतप्रधानांना करण्यात आली आहे. निवेदनावर समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, सचिव एस. एम. भाले यांच्यासह अन्य सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकwater transportजलवाहतूक