शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 5:51 PM

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या ...

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या वस्तूंची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे श्वास फाउण्डेशनचे अध्यक्ष विजय पाळेकर, कार्याध्यक्ष मकरंद वाघ यांनी सांगितले.केरळवासीयांच्या मदतीसाठी भारत भारती या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून, श्वास फाउण्डेशनच्या पुढाकारातून कळवणमधून दहा टन कांदा कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा व्यापारी असोसिएशन व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी भारत भारतीकडे सुपूर्द केला आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव व शहरप्रमुख साहेबराव पगार , विनोद मालपुरे, किशोर पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे किराणा वस्तूंच्या रूपाने मदत दिली. शिवसेनेने साखर,गहू, तांदूळ, बाजरी, तेलडबा, बेसन आदींसह किराणा वस्तू स्वरूपाची मदत श्वास फाउण्डेशनकडे सुपूर्द केली.कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी बांधवांना भारत भारती, श्वास फाउण्डेशन व बाजार समिती, कांदा व्यापारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी कांदा लिलाव दरम्यान आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे कळवणमधून दहा टन कांदा जमा झाला. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती सुनील देवरे, संचालक हेमंत बोरसे, योगेश महाजन, हरिश्चंद्र पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विष्णू बोरसे, भाजपाचे गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे, कांदा व्यापारी शरद गांगुर्डे, कांदा उत्पादक देवीदास शिंदे, मुन्ना पगार, दीपक वाघ, संतोष पगार, श्रीधर वाघ, दिनकर जाधव व नानाजी मोरे यांनी यावेळी शेतकरी बांधवांकडून कांदा संकलन करून श्वास फाउण्डेशनकडे जमा केला.--------------------केरळ पूरग्रस्तांसाठी कळवण बाजार समिती, कांदा व्यापारी व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कांदा व जीवनावश्यक वस्तू भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे सुपूर्द करताना बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, हरिश्चंद्र पगार, विष्णू बोरसे, राजेंद्र भामरे, योगेश महाजन , हरिश जाधव, विजय पाळेकर, मकरंद वाघ, गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे आदी. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर