शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
2
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
3
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
4
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
5
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
6
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
7
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
8
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
9
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
10
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
11
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
12
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
13
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
14
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
15
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
16
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
17
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
18
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
19
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
20
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
Daily Top 2Weekly Top 5

दहा टन कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 17:51 IST

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या ...

कळवण : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळवण शहर व तालुक्यातून वस्तू स्वरूपात मदतीचा ओघ सुरू झाला असून, दहा टन कांद्यासह, साखर, गहू, बाजरी, तांदूळ, बाजरी, तेलडबा आदी किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. भारत भारती व श्वास फाउण्डेशनच्या माध्यमातून रेल्वेने या वस्तूंची वितरण व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याचे श्वास फाउण्डेशनचे अध्यक्ष विजय पाळेकर, कार्याध्यक्ष मकरंद वाघ यांनी सांगितले.केरळवासीयांच्या मदतीसाठी भारत भारती या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून, श्वास फाउण्डेशनच्या पुढाकारातून कळवणमधून दहा टन कांदा कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती, कांदा व्यापारी असोसिएशन व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी भारत भारतीकडे सुपूर्द केला आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव व शहरप्रमुख साहेबराव पगार , विनोद मालपुरे, किशोर पवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे किराणा वस्तूंच्या रूपाने मदत दिली. शिवसेनेने साखर,गहू, तांदूळ, बाजरी, तेलडबा, बेसन आदींसह किराणा वस्तू स्वरूपाची मदत श्वास फाउण्डेशनकडे सुपूर्द केली.कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी बांधवांना भारत भारती, श्वास फाउण्डेशन व बाजार समिती, कांदा व्यापारी यांच्या वतीने आवाहन करण्यात आले. शेतकरी बांधवांनी कांदा लिलाव दरम्यान आवाहनाला प्रतिसाद दिल्यामुळे कळवणमधून दहा टन कांदा जमा झाला. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपसभापती सुनील देवरे, संचालक हेमंत बोरसे, योगेश महाजन, हरिश्चंद्र पगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विष्णू बोरसे, भाजपाचे गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे, कांदा व्यापारी शरद गांगुर्डे, कांदा उत्पादक देवीदास शिंदे, मुन्ना पगार, दीपक वाघ, संतोष पगार, श्रीधर वाघ, दिनकर जाधव व नानाजी मोरे यांनी यावेळी शेतकरी बांधवांकडून कांदा संकलन करून श्वास फाउण्डेशनकडे जमा केला.--------------------केरळ पूरग्रस्तांसाठी कळवण बाजार समिती, कांदा व्यापारी व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून कांदा व जीवनावश्यक वस्तू भारत भारती व श्वास फाउण्डेशन यांच्याकडे सुपूर्द करताना बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, हरिश्चंद्र पगार, विष्णू बोरसे, राजेंद्र भामरे, योगेश महाजन , हरिश जाधव, विजय पाळेकर, मकरंद वाघ, गोविंद कोठावदे, भूषण शिरोडे आदी. 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर