शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

गर्दीत ‘पर्वणी’ साधण्यासाठी स्पर्धा

By admin | Updated: February 12, 2017 22:15 IST

यात्रोत्सवात जनसंपर्काचा ‘प्रसाद’ : डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी लावून प्रचारास प्रारंभ

 शैलेश कर्पे सिन्नरमाघ पौर्णिमेला जिल्ह्यात अनेक ठिकाणी यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत यात्रा आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांना एकाच वेळी भेटण्याची ‘पर्वणी’ चालून आली आहे. यात्रा, उत्सव आणि आखाडे जिथे असतील तेथे उमेदवारांनी भेटी देण्याचा तडाखा लावल्याचे चित्र आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचाराला इन मिन आठ दिवस उरले आहेत. प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे थोरण सध्या राजकीय नेत्यांसह उमेदवारांनी जिल्ह्यात ठेवले असल्याचे दिसते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने ती मतदारांच्या भेटीसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या अशा उत्सवाचा राजकीय नेते पुरेपूर फायदा घेत असल्याचे चित्र आहे. यात्रेनिमित्त सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन, तमाशा, भारुडांचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा यामध्ये जाऊन प्रचार करण्यावर मोठा भर दिला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे. माघार सोमवारी असली तरी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म दिले असल्याने प्रमुख पक्षाचे जवळजवळ उमेदवार निश्चित झाले आहेत. माघारीनंतर तर अवघा सहा दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवार व राजकीय नेते मंडळी आत्तापासूनच प्रचाराच्या धामधुमीत लागले आहेत. उमेदवार व नेतेमंडळी लोकांपर्यंत पोहोचण्याची कोणतीच संधी सोडत नसल्याचे दिसते. धार्मिक कार्यक्रमात अनेक नागरिक एकाच ठिकाणी भेटतात अशा कार्यक्रमांना वर्गणी देण्यासह त्यात स्वत:ला मिरवून घेण्याची हौस उमेदवार पूर्ण करून घेत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्याबरोबरच वैयक्तिक, सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रचार करण्याचे माध्यम प्रत्येकजण स्वीकारत आहेत. लग्नकार्य, दशक्रिया, गंधाचे कार्यक्रम, वर्षश्राद्ध, साखरपुडे, वास्तुशांती अशा कार्यक्रमांपासून यात्रेतील कुस्त्यांचे आखाडे व रात्रीच्या लोकनाट्य तमाशाचे नारळ वाढविण्याच्या कार्यक्रमासदेखील सर्व नेतेमंडळी हजेरी लावत आहेत. एकाच कार्यक्रमास सर्व पक्षांचे उमेदवार व नेतेमंडळी येत असल्याने यजमानाला मोठा मान मिळत आहे.