शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

वडाळागाव परिसरातील समाजमंदिर बनले खंडहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 02:03 IST

इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.

इंदिरानगर : (संजय शहाणे) वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.वडाळागावात सुमारे १५ हजार लोकांची वस्ती आहे, यामध्ये शेतकरी व हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. वडाळागाव, सादिकनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, गुलशननगर, अण्णा भाऊ साठेनगर, सह परिसरात सुमारे ७० टक्के हातावर काम करणारी लोकवस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळागावातील घरकुल योजनालगत सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून समाजमंदिर बांधण्यात आले. जेणेकरून परिसरातील नागरिकांना लहान-मोठे कार्यक्रम घेता येतील. त्यामुळे नागरिकांना आर्थिक त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांपासून समाजमंदिराच्या देखभालीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चोरट्यांनी समाजमंदिराला असलेले लोखंडी ग्रील खिडक्या चोरून नेल्या. तसेच शौचालय बाथरूम व खोलीचे ही नुकसान केली आहे. तसेच समाजमंदिरात घाण व पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजमंदिरात क्रिकेट आणि मद्यपींचा, गांजा पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. लाखो रु पये खर्च करून समाजमंदिराचा सदुपयोग होत नसेल तर समाजमंदिर बांधले कशाला? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.-------------------डासांचा प्रादुर्भावसमाजमंदिरालगत घरकुल योजना सुमारे ७२० कुटुंब वास्तव करीत आहेत. या परिसरात डास, किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तातडीने समाजमंदिराची दुरु स्ती करून संस्थेस देखभालीसाठी द्यावे, अशी मागणी वडाळागाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक