शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

गतिमान लोकाभिमुख सेवा देण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक : नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होण्यासाठी, तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-ऑफिस, ...

नाशिक : नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे वेळेत होण्यासाठी, तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ई-ऑफिस, नाशिक मित्र वेबपोर्टल व ऑनलाइन आरटीएस या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

पोलीस संचलन मैदान येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार डॉ. भारती पवार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक महानगपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे. त्यात आपल्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांची शासकीय कार्यालयातील कामे नागरिकांचा हक्क म्हणून व्हावीत यादृष्टीने शासनाने लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत अधिसूचित केलेल्या वीस सेवांच्या व्यतिरिक्त स्वतःहून अतिरिक्त ८० सेवा आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिल्या जातात. या कायद्याअंतर्गत गेल्या वर्षभरात साडेदहा लाखांहून अधिक सेवा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने एक उच्चांक प्रस्थापित केला आहे.

जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिका नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी व शहर विकासासाठी कटिबद्ध असून, नाशिक महापालिकेला नुकताच शहर स्वच्छतेच्या संदर्भातील ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य हे एक कृषिप्रधान, उद्यमशील आणि लोकसेवेमध्ये अग्रेसर राज्य आहे. राज्यातील सर्वच घटकांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपले प्रजासत्ताक अधिक मजबूत करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरपत्नीस ताम्रपटाने सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा पुरस्कार, उल्लेखनीय कामगिरी बजावणारी रुग्णालये स्मार्ट ग्रामपंचायती, पोलीस पत्नी व कुटुंबीयांचा सत्कार, शिष्यवृत्ती पुरस्कार, सामाजिक वनीकरण विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.