शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

राखीव उमेदवारांच्या जात वैधतेची आयोगाकडून दखल

By श्याम बागुल | Updated: September 4, 2018 17:31 IST

दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आता

ठळक मुद्देमाहिती संकलित : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्याने जागराज्यभरातील हजारो सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

नाशिक : राखीव जागांवर निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने अधिक आक्रमक होत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, महापालिका व ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले किंवा नाही याची तातडीने माहिती मागविली आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रत्येक उमेदवाराची विहित नमुन्यात माहिती मागविली असून, त्यात उमेदवाराने नामांकन दाखल करताना जात वैधता समितीकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती जोडली होती काय? निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आता जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक अधिकाºयाकडे सादर केले काय? निवडून आल्यानंतर किती दिवसांनी प्रमाणपत्र सादर केले याची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राखीव जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवाराला निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा निवडणूक कायदा आहे. या कायद्याला स्थगिती मिळावी यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका पडून असताना गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिका फेटाळून स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, या संदर्भात निवडणूक आयोग व राज्य सरकार अंतीम निर्णय घेणार असले तरी, या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यामुळे आयोगाने अधिक आक्रमक होऊन आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राची खातरजमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर माहिती गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक