शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

कार्यशाळेत आयुक्तांचे मार्गदर्शन

By admin | Updated: October 22, 2016 00:04 IST

कळवण : तालुका स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

कळवण : नाशिक तालुक्यापाठोपाठ कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी पंचायत समितीसह तहसील, कृषी, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण यांसह सर्व विभागांची जबाबदारी व कर्तव्य असून, सर्वांनी एकजुटीने काम करून नागरिकांशी सुसंवाद साधावा. स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे ओळखून पाऊले उचलावी व नोव्हेंबरअखेर कळवण तालुका स्वच्छ व हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.पंचायत समिती कळवण येथील सभागृहात गुरुवारी (दि. २०) सर्व विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी महसूल आयुक्त एकनाथ डवले होते. बैठकीला नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी., तहसीलदार कैलास चावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे (पा. व स्व.) आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते.  ज्या ठिकाणी मानसिकता बदलणे अवघड आहे तेथे पोलीस ठाणे व तलाठी यांच्या सहकार्याने प्रसंगी कठोर पावले प्रशासनाने उचलावीत, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बैठकीत देऊन कळवण तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून प्रस्तावित ३३ गावांच्या संपर्क अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांकडून गावातील शौचालय बांधकाम प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला.  यावेळी स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाचा माहितीपट कळवणचे गटविकास अधिकारी तुकाराम सोनवणे यांनी सादर केला. कळवण तालुका हगणदारीमुक्त आढावा बैठकीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, सहायक गटविकास अधिकारी शिवाजी जाधव, कळवणचे पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक संजय घाटगे, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आढे व बशीर शेख, परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक प्रदीप आहिरे यांच्यासह कळवण तालुक्यातील सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. (वार्ताहर)