शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
3
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
4
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
5
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
6
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
7
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
8
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
9
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
10
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
11
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
12
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
13
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
14
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
15
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
16
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
17
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
18
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
19
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
20
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

शेतकरी मेळाव्यात राज्य शासनावर टीका

By admin | Updated: August 7, 2016 23:59 IST

अनिल कदम : पीक कर्जाबाबत निर्णय न झाल्यास जिल्हा बँकेवर मोर्चा

निफाड : पीककर्ज वितरणाबाबत जिल्हा बँकेने मंगळवारपर्यंत निर्णय न घेतल्यास बुधवारी जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार अनिल कदम यांनी निफाड येथे दिला.नाशिक जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पीककर्ज देणे एक महिन्यापासून बंद केले आहे़ त्यामुळे पुरेसा पाऊस होऊनही शेतकऱ्यांना पीक संगोपनासाठी पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी निफाड येथे मार्केट कमिटी सभागृहात रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात आमदार कदम अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नाबार्ड, जिल्हा बँक, विकास सेवा संस्था अशा त्रिसूत्रीने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो. अधिवेशनात नाबार्डने जिल्हा बँकेला कर्ज वितरणासंर्दभात कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे जिल्हा बँक उद्दिष्टांच्या पुढे कर्जपुरवठा करण्यास हतबल झाली आहे. नियमित व पूर्ण कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे बंद झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडकळीस आला आहे. कर्ज वितरणाबाबत मंगळवारपर्यंत जिल्हा बँकेने निर्णय न घेतल्यास बुधवारी शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार कदम यांनी मेळाव्याप्रसंगी दिला.याप्रसंगी व्यासपीठावर लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, उपसभापती सुभाष कराड, संचालक राजेंद्र डोखळे, पंढरीनाथ थोरे, बाळासाहेब क्षीरसागर, पिंपळगाव बाजर समितीचे संचालक भास्करराव बनकर, चिंतामण सोनवणे, रमेशचंद्र घुगे, संपतराव डुंबरे, भगीरथ शिंदे, शंकरराव कोल्हे, तुकाराम सातभाई, रामकृष्ण दराडे, शिवाजी तासकर, एस. आर. शिंदे, जानकीराम धारराव आदि मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकात राजेंद्र डोखळे यांनी आता गोड वाटणारी नियमनमुक्ती कडवट असल्याचे भविष्यात जाणवेल, अशी भीती व्यक्त केली. यावेळी भास्करराव बनकर, पंढरीनाथ थोरे यांनी सरकारच्या नियमनमुक्तीवर टीका केली. शेतकऱ्यांच्या वतीने जानकीराम धारराव, भीमराव काळे, भगीरथ शिंदे, एस. आर. शिंदे यांनीही भाजपा सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. (वार्ताहर)