शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वाहनाच्या धडकेत वाहतूक बेट उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:34 IST

गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देमालेगाव : दुरुस्ती न झाल्याने नागरिकांत नाराजी

मालेगाव कॅम्प : शहरात मनमाड चौफुलीजवळून प्रवेश केल्यानंतर गिरणापुलाजवळ बांधण्यात आलेल्या वाहतूक बेटास गेल्या महिन्यात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे बेट उद्ध्वस्त झाले आहे. शहराच्या प्रवेशद्वारावरच उद्ध्वस्त झालेले वाहतूक बेट बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशंचे लक्ष वेधून घेत असून, त्याची एकच चर्चा सुरू आहे.शहरातील व बाहेरगावातून येणाºया नागरिकांमध्ये याची अद्याप दुरुस्ती न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाहतूक बेट त्वरित दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. नगरसेवक निधीऐवजी दुसºया निधी अंतर्गत याचे बांधकाम करण्यात आले तर हे बांधकाम करताना मुख्य रस्त्यांचा मध्यबिंदू (सेंटर) साधण्यात आला नाही तर हे बेट तांत्रिकदृट्या चुकीचे मोजमाप प्रमाणे साकारण्यात आले असा आरोप होत आहे. बांधकाम झाल्यानंतर वाहतूक बेट वाहतुकीसाठी काहीचे अडचणीचे ठरत असल्याचे वाहनचालक म्हणतात. गिरणा पुलावरून आल्याहून काही क्षणात बेट समोर दिसते. त्यामुळे चालक काहीसे बिथरतात व अपघाताची शक्यता निर्माण होते असाच अवधानाने गेल्या महिन्यात या वाहतूक बेटास अज्ञात वाहनाने धडक देऊन पोबारा केला. त्यामुळे बांधकामाचे दर्शनी भाग पूर्णत: तुटलेला आहे. अपघातानंतर दुरुस्तीसाठी मनपाचे दुर्लक्ष होत आहे. हे वाहतूक बेट खरे अर्थाने चांगल्या पद्धतीने बांधून त्यामध्ये सायकलस्वाराचा धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. सायकल चालविणे आरोग्यासाठी चांगले आहे हा संदेश सर्वत्र जातो परंतु बांधकामानंतर याचा देखभालीकडे दुर्लक्ष झाले. यामध्ये जंगली गवत उगले आहे. तर सायकल पुतळा दिसेनासा झाला आहे व अपघातानंतर याची दुरावस्था झाली आहे. शहरात पुणे, मुंबई, नाशिककडे ये-जा करणारे असंख्य वाहने येथूनच प्रयाण करतात त्यामुळे या उद्ध्वस्त बेटाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे लवकर या वाहतूक बेटाचे पुन्हा सुशोभीकरण करण्याची मागणी होत आहे. शहर विकास आराखडा निधीअंतर्गत टेहरे फाटा, दरेगाव व गिरणापुल परिसरात शहराच्या प्रवेशद्वारांवर बेट बांधण्यात येणार आहे. त्यापैकी गिरणापूलनजीक वाहतूक बेट मागील वर्षी बांधण्यात आले परंतु हे बेट बांधण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांचा ताळमेळ बसला नाही.

टॅग्स :Accidentअपघात