शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

थंडीच्या कडाक्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी हवामानाचा फटका : द्राक्षमण्यांना तडे, भुरी रोग वाढण्याची भीती; बागा वाचविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:08 IST

निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने मंगळवारी पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार वाढत्या थंडीने द्राक्षमण्यांना तडे व भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत.

सायखेडा : निफाड तालुक्यात थंडीचा जोर वाढल्याने मंगळवारी पारा १० अंशावर आला आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार वाढत्या थंडीने द्राक्षमण्यांना तडे व भुरी रोग वाढण्याच्या भीतीने धास्तावले आहेत. अनेक काळी द्राक्ष देण्यासाठी तयार झाली असली तरी सतत बदलत असलेल्या हवामानामुळे पीक शेवटच्या टप्प्यात धोक्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी ओखी वादळाच्या तडाख्यातून शेतकरी कसाबसा सावरत असतानाच दोन दिवसांपासून थंडी वाढली आहे. थंडीसोबत कधी ढगाळ तर कधी वारा असा वातावरणात सतत बदल होत आहे. त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शिवाय मणी फुगवण थांबली आहे. जे प्लॉट देण्यासाठी आले आहे, त्यांना वाढत्या थंडीने तडे जात असल्याने शेतकºयांच्या तोंडाजवळ आलेला घास निसर्ग हिरावून नेतोय का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे कांदा, पालेभाज्या, फळभाज्या यांच्यावर मावा, अळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांची वाढ होत नाही, शेतात उभे पीक करपा रोगामुळे वाया जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. द्राक्ष बागायतदार शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी कसरतीमुळे लाखो रुपये खर्च वाढत असूनही बाग वाचविणे जिकिरीचे झाले आहे.