शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नाशकात थंडीचा कडाका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:40 IST

हिवाळ्याच्या या  हंगामात सर्वाधिक नीचांकी  तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.

नाशिक : हिवाळ्याच्या या  हंगामात सर्वाधिक नीचांकी  तापमान मंगळवारी (दि. ११) ९.४ अंश इतके नोंदविले गेले.बुधवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील हवामान निरीक्षण केंद्राकडून ९.६ इतके किमान तापमान मोजण्यात आले. शहरात मागील दोन ते तीन दिवसांपासून थंडीचा कडाका कायम असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सर्वाधिक कमी  ८.८ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.जिल्ह्यातील थंडीच्या  वाढत्या कडाक्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,  असे मत डॉक्टरांनी व्यक्तकेले आहे.  राज्यात सोमवारी (दि. १०) सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. शहरात किमान तापमान १२.८ तर कमाल तापमानाचा पारा थेट २८.२ अंशापर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे सध्या राज्यात नाशिक महाबळेश्वरपेक्षाही अधिक थंड शहर बनले आहे. मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा कमी-जास्त होत असल्याचे थंडीच्या तीव्रतेतही फरक पडत होता; मात्र अचानकपणे या आठवड्यात हवामानात कमालीचा बदल झाला. मंगळवारपासून किमान तापमानाचा पारा त्यापेक्षाही अधिक खाली घसरू लागल्याने थंडीने शहर गारठले आहे. मंगळवारी ९.४, बुधवारी ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले. एकूणच थंडीचा कडाका वाढताच नाशिककरांनी उबदार कपड्यांच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक चहा, कॉफीला पसंती देत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात होते तर सकाळी अकरा वाजेपर्यंत वातावरणात थंडी जाणवत असल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. किमान तापमानाचा पारा कमी झाल्यामुळे कमाल तापमानदेखील तिशीच्या खाली सरकले आहे. या हंगामात ९.२ ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली आहे.गतवर्षापेक्षा यंदा जोर अधिकगेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी थंडीचा जोर अधिक असल्याचे हवामान खात्याकडील नोंदींवरून स्पष्ट होते. यंदा पर्जन्यमानाचे प्रमाण कमी राहिले असले तरी थंडीचा कडाका मात्र अधिक असल्याचे जाणवत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ९, १०, ११, १२ या तारखांना अनुक्रमे किमान तापमान १५.२, १५.४, १४.००, १३.२ अंश इतके नोंदविले गेले होते. मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी सर्वाधिक नीचांकी ७.६ अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद झाली होती. यावर्षी या तारखांना अनुक्रमे ११.३, १२.८, ९.४, ९.६ इतके किमान तापमान नोंदविले गेले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणTemperatureतापमान