शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:24 IST

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावलेसायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.मागील महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षबागेला मणी कुज आणि डावणी या रोगांनी ग्रासले होते. अनेक बागा कुज आणि गळ झाल्यानंतरही उभ्या राहिल्या. काही ठिकाणी उताराची आणि उंचावरील जमीन असल्याने व कष्टकरी शेतकरी असल्याने महागड्या फवारण्या करून पीक वाचवले असले तरी आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागल्याने या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच गोदाकाठ भागात नदीलगत उसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. बैलगाडी, चार भांडी, मोजकेच कपडे घेऊन थाटलेला संसारात उबदार कपडे कोठून असणार? त्यांनाही या थंडीचा सामना करावा लागत आहे.वाढत्या थंडीची सर्वांना जरी डोकेदुखी ठरत असली तरी गरम कपड्यांच्या दुकानातील वाढती गर्दी दुकानदारांना सुखद धक्का देणारी आहे. कानटोपी, स्वेटर, मफरल, हॅण्डग्लोज, पायमोजे खरेदीसाठी गरम कपड्यांची दुकाने गजबजू लागली आहेत. गुलाबी थंडीने मात्र रस्त्यालगत उघड्यावर संसार थाटणाºया गरीब कुटुंबाला मोठा सामना करावा लागत आहे. पाल ठोकून राहाणारे नागरिक वाढत्या थंडीमुळे त्रस्त झाले आहेत. अंगावर फाटके कपडे, अंथरून- पांघरूण म्हणून कमी असलेल्या कपड्यांमुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे.आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यतागहू, कांदा भाजीपाला पिकासाठी थंडी चांगली असली तरी या पिकांसाठी कमी भांडवल आणि त्या तुलनेत कमी उत्पादन मिळते मात्र द्राक्ष पिकासाठी प्रचंड भांडवल आण िउत्पादनही चांगले मिळत असल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणति अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात थंडी पडली तर द्राक्ष मान्यांना तडे जाण्याचा संभव असतो शिवाय भुरी सारखा प्रभावी रोग घडात शिरकावा करतो त्यामुळे पीक बाजारात विक्र ीसाठीजाईलच याची शास्वती नसल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्यांना महागडे औषधें फवारणी करावी लागत आहेखर्चात वाढ होत असल्यानेआर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे.एक महिन्यापूर्वी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात कुज ,डावणी, गळ यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा सुलतानी संकट उभे राहिले आहे, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांना आटापिटा करावा लागत आहे शिवाय थंडीने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे-दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरेगोदाकाठ भागात वाढत्या थंडीमुळे कांदा, ऊस, गहू पिकावर चांगला परिणाम होत असला तरी द्राक्ष पिकावर भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे भुरी रोगावरील औषधें खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो पर्यायाने खर्च वाढत आहे- सोपान खालकर, औषध विक्रते.