शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

गोदाकाठ गारठला थंडी : कांदा, गहू उत्पादक सुखावले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:24 IST

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावले सायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

भुरी, तड्यांनी द्राक्ष बागाईतदार धास्तावलेसायखेडा : गोदाकाठ परिसरात थंडीचा जोर वाढू लागल्याने कांदा, गहू पीक उत्पादक सुखावले असले तरी, द्राक्ष बागायईतदार मात्र धास्तावले आहेत. अतिथंडीमुळे द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. शिवाय द्राक्ष फुगवणीवरदेखील परिणाम होऊन द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.मागील महिन्यात बेमोसमी पाऊस झाला. त्यामुळे द्राक्षबागेला मणी कुज आणि डावणी या रोगांनी ग्रासले होते. अनेक बागा कुज आणि गळ झाल्यानंतरही उभ्या राहिल्या. काही ठिकाणी उताराची आणि उंचावरील जमीन असल्याने व कष्टकरी शेतकरी असल्याने महागड्या फवारण्या करून पीक वाचवले असले तरी आता पुन्हा थंडीचा जोर वाढू लागल्याने या संकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच गोदाकाठ भागात नदीलगत उसाचे क्षेत्र मोठे असल्याने ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत. बैलगाडी, चार भांडी, मोजकेच कपडे घेऊन थाटलेला संसारात उबदार कपडे कोठून असणार? त्यांनाही या थंडीचा सामना करावा लागत आहे.वाढत्या थंडीची सर्वांना जरी डोकेदुखी ठरत असली तरी गरम कपड्यांच्या दुकानातील वाढती गर्दी दुकानदारांना सुखद धक्का देणारी आहे. कानटोपी, स्वेटर, मफरल, हॅण्डग्लोज, पायमोजे खरेदीसाठी गरम कपड्यांची दुकाने गजबजू लागली आहेत. गुलाबी थंडीने मात्र रस्त्यालगत उघड्यावर संसार थाटणाºया गरीब कुटुंबाला मोठा सामना करावा लागत आहे. पाल ठोकून राहाणारे नागरिक वाढत्या थंडीमुळे त्रस्त झाले आहेत. अंगावर फाटके कपडे, अंथरून- पांघरूण म्हणून कमी असलेल्या कपड्यांमुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे.आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यतागहू, कांदा भाजीपाला पिकासाठी थंडी चांगली असली तरी या पिकांसाठी कमी भांडवल आणि त्या तुलनेत कमी उत्पादन मिळते मात्र द्राक्ष पिकासाठी प्रचंड भांडवल आण िउत्पादनही चांगले मिळत असल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणति अवलंबून असते. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात थंडी पडली तर द्राक्ष मान्यांना तडे जाण्याचा संभव असतो शिवाय भुरी सारखा प्रभावी रोग घडात शिरकावा करतो त्यामुळे पीक बाजारात विक्र ीसाठीजाईलच याची शास्वती नसल्याने थंडी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्यांना महागडे औषधें फवारणी करावी लागत आहेखर्चात वाढ होत असल्यानेआर्थिक गणति कोलंडण्याची शक्यता आहे.एक महिन्यापूर्वी बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती त्यात कुज ,डावणी, गळ यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले त्यात आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीमुळे शेतकर्यांसमोर पुन्हा एकदा सुलतानी संकट उभे राहिले आहे, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकर्यांना आटापिटा करावा लागत आहे शिवाय थंडीने द्राक्ष फुगवणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे-दत्तू मुरकुटे, शेतकरी, म्हाळसाकोरेगोदाकाठ भागात वाढत्या थंडीमुळे कांदा, ऊस, गहू पिकावर चांगला परिणाम होत असला तरी द्राक्ष पिकावर भुरीच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यामुळे भुरी रोगावरील औषधें खरेदी करण्यासाठी शेतकर्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसतो पर्यायाने खर्च वाढत आहे- सोपान खालकर, औषध विक्रते.