शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे पिके तरारली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:46 IST

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होऊन थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे.सततचे ढगाळ हवामान व दुपारी उन्हाच्या चटक्यांनी शेतातील पिके पिवळे पडुन खराब होऊ लागले होते.या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना गव्हु,हरभरा ,कांदा,टमाटे,कोबी व फ्लावर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किड,मावा,तुडतुडे,चिकटा आदी विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत होता.त्यामुळे शेतकर्यांना दररोज महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत होत्या.दररोज वातावरणात कधी ढगाळ तर कधी तीव्र उन्हाचे चटके अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला होता.अचानक गायब झालेल्या थंडीमुळे रब्बीच्या सर्वच पिकांचे पिवळे पडुन नुकसान होण्यास सुरवात झाली होती.दरम्यान गेल्या आठवड्या पासून वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याने पिकांची विविध रोगांपासून मुक्तता होण्यास मदत झाली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी पडणा-या थंडीमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे.त्यामुळे रब्बीचे सर्वच पिके सध्या तरारली आहे.सध्याचे वातावरण शेती पिकांना पोषक असल्यामुळे शेती-शिवारातील अन्य पिकांबरोबर गव्हु व हरभ-यांचे पिके तरारली आहे.सध्या असलेले वातावरण आणखी पंधरा दिवस टिकून राहिले तर गव्हा बरोबर हरभ-याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.----------------------यंदाच्या वर्षी वरूणराजाने चांगली क्रु पाद्रूष्टी केल्याने आजही गावातल्या सर्वच नद्यांना पाणी झुळ-झुळत आहे.परिणामी विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे येरवी जानेवारीनंतर भकास दिसणारा नायगाव खोरा यंदा फेब्रुवारी मिहण्यातही हिरवागार दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक