शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

थंडीमुळे पिके तरारली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 14:46 IST

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

नायगाव - गेल्या आठवड्यापासून थंडीचे पुन्हा आगमन झाल्याने रब्बीचे सर्वच पिके तरारली आहे.गहू व हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. वातावरणात बदल होऊन थंडीचे पुन्हा आगमन झाले आहे.सततचे ढगाळ हवामान व दुपारी उन्हाच्या चटक्यांनी शेतातील पिके पिवळे पडुन खराब होऊ लागले होते.या खराब हवामानामुळे शेतकऱ्यांना गव्हु,हरभरा ,कांदा,टमाटे,कोबी व फ्लावर आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किड,मावा,तुडतुडे,चिकटा आदी विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत होता.त्यामुळे शेतकर्यांना दररोज महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत होत्या.दररोज वातावरणात कधी ढगाळ तर कधी तीव्र उन्हाचे चटके अशा प्रकारच्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला होता.अचानक गायब झालेल्या थंडीमुळे रब्बीच्या सर्वच पिकांचे पिवळे पडुन नुकसान होण्यास सुरवात झाली होती.दरम्यान गेल्या आठवड्या पासून वातावरणात कमालीचा गारवा वाढल्याने पिकांची विविध रोगांपासून मुक्तता होण्यास मदत झाली आहे.दररोज सकाळ-संध्याकाळी पडणा-या थंडीमुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे.त्यामुळे रब्बीचे सर्वच पिके सध्या तरारली आहे.सध्याचे वातावरण शेती पिकांना पोषक असल्यामुळे शेती-शिवारातील अन्य पिकांबरोबर गव्हु व हरभ-यांचे पिके तरारली आहे.सध्या असलेले वातावरण आणखी पंधरा दिवस टिकून राहिले तर गव्हा बरोबर हरभ-याचे उत्पादन वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.----------------------यंदाच्या वर्षी वरूणराजाने चांगली क्रु पाद्रूष्टी केल्याने आजही गावातल्या सर्वच नद्यांना पाणी झुळ-झुळत आहे.परिणामी विहिरींची पाणी पातळी वाढलेली आहे.त्यामुळे येरवी जानेवारीनंतर भकास दिसणारा नायगाव खोरा यंदा फेब्रुवारी मिहण्यातही हिरवागार दिसत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक