शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आचारसंहितेची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:14 IST

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.

येवला : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या अर्थात स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आणि २० एप्रिलपासून आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली असून, २९ मे पर्यंत लागू राहणार आहे.  येवला शहर हद्दीतील सर्वच उद्घाटनाचे फलक कागदाने झाकण्याची मोहीम येवला पालिकेने सोमवारी सकाळीच सुरू केली. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ असणारे फलक झाकण्यात आले आहे. येथील सेनापती तात्या टोपे स्मारकचा उद्घाटनाचा फलक झाकण्यासह अन्य कामे पालिका कर्मचाऱ्यांनी केली. मतदार प्रभावित होऊ नये म्हणून शहर हद्दीतील सर्वच राजकीय पक्षांचे फलक, उद्घाटनाच्या कामाचे फलक झाकण्याचे काम केले जात आहे. येवला पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका कर्मचाºयांची तातडीची बैठक घेऊन आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी काय व कसे काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले.  मुळातच पालिकेची सर्वच कामे ठप्प असताना आचारसंहिता लागली. आता तर आचारसंहिता लागू झाल्याने येवला पालिकेची सर्वच कामे ठप्प राहणार आहेत. त्यामुळे परिस्थितीत काहीही बदल नसला तरी आता काम होत नाही अशी ओरड किमान आचारसंहिता असल्याने करता येणार नाही. ज्या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले आहेत त्या कामांना अडचण येणार नाही. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे. पालिका अध्यक्ष यांच्यासह सर्वच पदाधिकाºयांची शासकीय वाहने पालिकेने जमा करून घेतली आहे. निवडणुकीसाठी पूर्ण जिल्ह्याला आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.मुख्याधिकायांच्या सूचनानिवडणुकीवर परिणाम करणारे गावातील सर्व प्रकारचे फलक काढून घेणे, शासकीय मालकीची वाहने ताब्यात घेणे, रॅलीसह विविध कार्यक्र माच्या अधिकृत परवानग्या काढणे याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. सर्व कामे तत्परतेने करण्याचे सूचित केले. नवीन प्रस्तावित कामे करण्याचा विचार असलाच तर या कामांना मात्र फटका बसणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक