शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

रणरणत्या उन्हाळ्यात कोळुष्टी टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:06 IST

पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

पेठ -एका बाजूला दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रात पाणी मिळवण्यासाठी गावखेड्यातील लोकांना करावे लागत असलेले जीवघेणे प्रयत्न माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. परंतु त्याच वेळी दुसर्या बाजूला ऐन उन्हाळ्यात आपल्या दारात पाणी आल्याने पेठ तालुक्यातील कोळुष्टीचे गावकरी मात्र आनंदाने जल्लोष करत आहेत. ही विरोधाभासी किमया घडवली आहे सोशल नेटवर्किंग फोरमने. अलीकडेच पूर्णत्वास गेलेला हाच पाणी प्रकल्प काल गावकर्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या लोकार्पण सोहळ्यास खास अमेरिकेतून आलेले उद्योजक वसंत राठी, किशोर राठी, डॉ. अभिजीत राठी, फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.व्यवसायासाठी अमेरिकेत रहात असताना एसएनएफ आदिवासी भागात करत असलेल्या कामाची योगेश कासट यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे कोळुष्टी सारख्या दुर्गम गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मदत करता आली. या गावकर्यांच्या चेहर्यावरील आनंद बघणे हा आयुष्यभरासाठी अमूल्य ठेवा आहे असे राठी यांनी कार्यक्र मात बोलताना सांगितले.गेल्या कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात दोन तीन किलोमीटरवरून डोक्यावर पाणी आणावे लागायचे. आमचे हे कष्ट राठी बंधू आणि फोरमच्या लोकांनी वाचवले याबद्दल त्यांचे आभार कसे मानावे हेच कळत नाही अशी प्रतिक्रि या ग्रामपंचायत सदस्य शेवंता बोरसे यांनी दिली. गावकऱ्यांचे श्रमदान, टीम फोरमचे तांत्रिक ज्ञान, आण िलोकसहभागातून आर्थिक मदत या एसएनएफ पॅटर्नच्या त्रिसूत्रीतून हे काम पूर्ण करण्यात आले. अ‍ॅडव्हान्स एन्झाईम्स या कंपनीने कोळुष्टी पाणी प्रकल्पासाठी देणगी दिली. ग्रामपंचायतनेही पाण्याची टाकी बांधली. सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नातून चार मिहन्यात हा प्रकल्प पूर्ण करु न अतिशय ऊत्साहात लोकार्पण करण्यात आले. रामदास शिंदे यांनी सुत्रसंचलन तर संदिप बत्तासे यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक