शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

नाशिक महापालिकेत युतीची सत्ता सर्वाधिक काळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST

नाशिक : महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजप युतीची राहिली असून शिवसेना आणि भाजप युती म्हणून सात ...

नाशिक : महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजप युतीची राहिली असून शिवसेना आणि भाजप युती म्हणून सात वेळा महापौरपद राहिले आहे. स्वबळाचा विचार केला तर भाजपालाच पंचवीस वर्षात पूर्ण बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना दोन वेळा महापौरपद मिळाले आहे. विशेष म्हणजे अपुऱ्या संख्याबळावर का होईना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोनवेळा महापौरपद मिळवले आहे. परंतु राष्ट्रवादीला मात्र एकदाही खाते खोलता आलेले नाही.

नाशिक महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सत्ता कोणाची येणार या विषयी राजकीय पक्ष दावे-प्रतिदावे मांडत आहेत. परंतु गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकींचा धांडोळा घेतला तर सर्वाधिक काळ सत्ता शिवसेना-भाजपाकडे राहिली आहे. आणि गेल्या तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच भाजपला पूर्ण बहुमत मिळाले असून त्यामुळे त्यांच्याकडील महापौरपदाचे निर्भेळ यश मिळाले आहे.

नाशिक महापालिकेची स्थापना ७ नोव्हेंबर १९८२ रोजी झाली. मात्र, सुरुवातीला दहा वर्षे महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. त्यानंतर १९९२ मध्ये पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी १६ अपक्ष नगरसेवकांच्या साहाय्याने काँग्रेस पक्षाच्या ताब्यात सत्ता होती. त्यानुसार १९९२ ते ९३ आणि ९३ ते ९४ असे दोन वर्षे काँग्रेसचे नेते शांतारामबापू कोंडाजी वावरे यांच्याकडे महापौरपद होते. त्यानंतर १९९४ ते ९५ पुन्हा कॉंग्रेस पक्षाचे पंडितराव खैरे यांच्याकडे महापौरपद हेाते. ९५ ते ९६ हे एक वर्ष केवळ काँग्रेस पक्षात फूट पडल्याने युती पुरस्कृत अपक्ष ॲड. उत्तमराव ढिकले हे महापौर झाले परंतु नंतर मात्र काँग्रेसचे प्रकाश मते पुन्हा महापौर झाले.

यानंतर १९९९ ते २००१ या तीन वर्षात काँग्रेस पक्षाच्या डॉ. शोभा बच्छाव महापौर झाल्या. त्या वगळता आजवर या पक्षाला पुन्हा सत्तेचा सूर गवसला नाही. दरम्यान, १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर महापालिकेतील सत्ता समीकरणे बदलली होती. १९९७ मध्ये शिवसेना आणि भाजपा युतीचे बहुमत हुकले असले तरी तीन अपक्षांच्या जीवावर सत्तांतर झाले. वसंत गिते हे शिवसेनेचे पहिले महापौर म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी अपक्ष गटाने केलेल्या मदतीची परतफेड अशोक दिवे यांना महापौर करून केली. पुढील वर्षी शिवसेनेच्या (कै.) सुरेखा भोसले यांचे महापौरपद अटळ असताना सेना-भाजपातील फुटीरांमुळे कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांना महापौरपद मिळाले. काँग्रेसचे हे शेवटचे महापौरपद. त्यानंतर मात्र, युतीनेच वर्चस्व राखले. २००२ मध्ये शिवसेनेचे ३८ आणि भाजपाचे २२ असे ६० नगरसेवकांचे बहुमत असल्याने दशरथ पाटील आधी आणि त्यानंतर कमी संख्याबळ असूनही भाजपाच्या बाळासाहेब सानप यांना महापौरपदाची संधी मिळाली. २००७ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. मात्र, अपक्ष विनायक पांडे यांनी जुगाड जमवत महापौरपद पटकावले. त्यांच्यानंतर शिवसेनेच्याच नयना घोलप यांनाही संधी मिळाली. मात्र, नंतर मात्र सलग दहा वर्षे शिवसेनाही सत्तेपासून वंचित आहे.

इन्फो...

२०१२ मध्ये मनसेच्या लाटेत शिवसेनेला दणका बसला. मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले आणि आधी भाजप तर नंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी अपक्षाच्या पाठबळावर पहिली अडीच वर्षे ॲड. यतीन वाघ आणि नंतरची अडीच वर्षे अशोक मूर्तडक यांना संधी मिळाली. २०१७ मध्ये तर संपूर्ण राजकारणच बदलले, शिवसेना आणि भाजप राज्यात सत्तेत असतानाही सलग दुसऱ्यावेळी स्वतंत्र निवडणूक लढले आणि त्यात ६६ नगरसेवकांसह भाजपने बहुमत मिळवले आहे. आधी अडीच वर्षे पक्षाच्या रंजना भानसी यांनी महापौरपद भूषवले आणि आता सतीश कुलकर्णी हे पद भूषवत आहेत.

इन्फो...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यानंतर महापालिकेत अनेकदा कळीची भूमिका या पक्षाने निभावली. विनायक पांडे यांच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादीची किंगमेकरची भूमिका होती. त्यानंतर आधी मनसेला सत्ता देताना आधी विरोध पुढील अडीच वर्षे समर्थन अशा भूमिकेतही राष्ट्रवादी राहिली. परंतु बाहुबळ असूनही या पक्षाला एकदाही महापौरपदाची संधी मिळू शकलेली नाही.