शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सहकारी बॅँकांची शक्कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक : वाहन जप्ती टाळण्यासाठी स्टिकर काढून वसुलीसाठी वापर

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.मार्च महिना हा बॅँकेच्या आर्थिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एरव्ही वर्षभर थकबाकीदार, कर्जदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बॅँका मात्र मार्च महिन्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावला जातो, त्यासाठी बॅँकांकडूनच विशेष वसुली पथक गठीत करून बॅँकेच्या वाहनाने गावोगावच्या कर्जदारांच्या घरी जावून वसुली केले जाते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नियमानुसार सहकारी संस्था व सहकारी बॅँकांनाही त्यांची वाहने शासन जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना सहकार विभागाने सर्व सहकारी बॅँका व संस्थांना दिल्या आहेत. प्रत्येक बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबरच वसुलीसाठी तीन ते चार वाहने असतात. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता, संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला सुमारे तीन हजारांहून अधिक वाहनांची गरज आहे. परंतु निवडणूक आचारसंहिता जारी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्हा बॅँकेसह शहरातील नामको, जनलक्ष्मी, गोदावरी, राजलक्ष्मी, विश्वास आदी सहकारी बॅँकांनी त्यांची वाहने जमा केली नसल्याची बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही बॅँकांनी आपल्याकडे वाहनेच नाहीत असा पवित्रा घेतला, परंतु त्यांची वसुली पथके मात्र वाहने घेऊन राजरोस फिरत असल्याचे चित्र आहे.कारवाई होण्याची शक्यतासहकार विभागाने बजावूनही जर या बॅँकांनी वाहने जमा केली नाहीत, तर आरटीओमार्फत ती जेथे असतील तेथून ताब्यात घेण्याची कार्यवाही होऊ शकते याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे या बॅँकांनीही नवीन शक्कल लढविली असून, वसुलीसाठी फिरणाºया बॅँकांच्या वाहनांवर बॅँकेच्या नावाचे असलेले स्टिकर काढून टाकले आहेत. जेणे करून वाहन बॅँकेचे आहे, याचा खुलासा होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र