शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बॅँकांची शक्कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक : वाहन जप्ती टाळण्यासाठी स्टिकर काढून वसुलीसाठी वापर

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.मार्च महिना हा बॅँकेच्या आर्थिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एरव्ही वर्षभर थकबाकीदार, कर्जदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बॅँका मात्र मार्च महिन्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावला जातो, त्यासाठी बॅँकांकडूनच विशेष वसुली पथक गठीत करून बॅँकेच्या वाहनाने गावोगावच्या कर्जदारांच्या घरी जावून वसुली केले जाते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नियमानुसार सहकारी संस्था व सहकारी बॅँकांनाही त्यांची वाहने शासन जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना सहकार विभागाने सर्व सहकारी बॅँका व संस्थांना दिल्या आहेत. प्रत्येक बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबरच वसुलीसाठी तीन ते चार वाहने असतात. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता, संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला सुमारे तीन हजारांहून अधिक वाहनांची गरज आहे. परंतु निवडणूक आचारसंहिता जारी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्हा बॅँकेसह शहरातील नामको, जनलक्ष्मी, गोदावरी, राजलक्ष्मी, विश्वास आदी सहकारी बॅँकांनी त्यांची वाहने जमा केली नसल्याची बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही बॅँकांनी आपल्याकडे वाहनेच नाहीत असा पवित्रा घेतला, परंतु त्यांची वसुली पथके मात्र वाहने घेऊन राजरोस फिरत असल्याचे चित्र आहे.कारवाई होण्याची शक्यतासहकार विभागाने बजावूनही जर या बॅँकांनी वाहने जमा केली नाहीत, तर आरटीओमार्फत ती जेथे असतील तेथून ताब्यात घेण्याची कार्यवाही होऊ शकते याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे या बॅँकांनीही नवीन शक्कल लढविली असून, वसुलीसाठी फिरणाºया बॅँकांच्या वाहनांवर बॅँकेच्या नावाचे असलेले स्टिकर काढून टाकले आहेत. जेणे करून वाहन बॅँकेचे आहे, याचा खुलासा होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र