शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

सहकारी बॅँकांची शक्कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:33 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक : वाहन जप्ती टाळण्यासाठी स्टिकर काढून वसुलीसाठी वापर

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणीचा भाग म्हणून लोकप्रतिनिधींकडील शासकीय वाहने जमा करण्यात आली असली तरी, राजकीय व्यक्तींच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्था व बॅँकांची वाहनेदेखील निवडणूक आचारसंहितेनुसार शासन जमा होणे अपेक्षित आहे, तथापि, जिल्ह्यातील सहकारी बॅँका व संस्थांनी आपली वाहने अद्याप जमा केली नसून, ही वाहने आरटीओमार्फत जप्त करण्याच्या भीती पोटी बॅँकांनी वाहनांवर लावलेले बॅँकेच्या नावाचे स्टिकर काढून टाकले आहेत.मार्च महिना हा बॅँकेच्या आर्थिक वर्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, एरव्ही वर्षभर थकबाकीदार, कर्जदारांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बॅँका मात्र मार्च महिन्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावला जातो, त्यासाठी बॅँकांकडूनच विशेष वसुली पथक गठीत करून बॅँकेच्या वाहनाने गावोगावच्या कर्जदारांच्या घरी जावून वसुली केले जाते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे नियमानुसार सहकारी संस्था व सहकारी बॅँकांनाही त्यांची वाहने शासन जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचना सहकार विभागाने सर्व सहकारी बॅँका व संस्थांना दिल्या आहेत. प्रत्येक बॅँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांबरोबरच वसुलीसाठी तीन ते चार वाहने असतात. लोकसभा निवडणुकीचा आवाका पाहता, संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाला सुमारे तीन हजारांहून अधिक वाहनांची गरज आहे. परंतु निवडणूक आचारसंहिता जारी होऊन पाच दिवसांचा कालावधी उलटला तरी जिल्हा बॅँकेसह शहरातील नामको, जनलक्ष्मी, गोदावरी, राजलक्ष्मी, विश्वास आदी सहकारी बॅँकांनी त्यांची वाहने जमा केली नसल्याची बाब निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आली आहेत. विशेष म्हणजे यातील काही बॅँकांनी आपल्याकडे वाहनेच नाहीत असा पवित्रा घेतला, परंतु त्यांची वसुली पथके मात्र वाहने घेऊन राजरोस फिरत असल्याचे चित्र आहे.कारवाई होण्याची शक्यतासहकार विभागाने बजावूनही जर या बॅँकांनी वाहने जमा केली नाहीत, तर आरटीओमार्फत ती जेथे असतील तेथून ताब्यात घेण्याची कार्यवाही होऊ शकते याची पुरेपूर जाणीव असल्यामुळे या बॅँकांनीही नवीन शक्कल लढविली असून, वसुलीसाठी फिरणाºया बॅँकांच्या वाहनांवर बॅँकेच्या नावाचे असलेले स्टिकर काढून टाकले आहेत. जेणे करून वाहन बॅँकेचे आहे, याचा खुलासा होणे कठीण झाले आहे.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र