शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

लोकसभेच्या कामगिरीनुसार व्हावे जागावाटप

By admin | Updated: July 21, 2014 02:01 IST

लोकसभेच्या कामगिरीनुसार व्हावे जागावाटप

 

नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील पक्षांच्या कामगिरीनुसार विधानसभा निवडणुकीचे जागावाटप व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले़ येथील कालिदास कलामंदिरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते़तटकरे पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने कमी उमेदवार उभे केले असतानाही अधिक खासदार निवडून आले़ त्या तुलनेत काँग्रेसला यश मिळू शकले नाही़ त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप करताना या यशाचा विचार होणे गरजेचे आहे़ अधिक जागांसाठी आमचा आग्रह राहील असेही तटकरे म्हणाले़ गुजरातच्या विकासाबाबत बरीच चर्चा होत असली तरी नाशिकच्या विकासाचे रोलमॉडेलही चांगले असून त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे़ भाजपाचे राज्यस्तरीय नेते जनतेची दिशाभूल करीत आहेत़ कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहनही त्यांनी केले़राज्यात गेल्या पंचवीस वर्षांतील भीषण अशी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ कृषिसंजीवनी, पाणीपुरवठा अशा विविध योजना राबवून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार हे शेतकरी, तसेच राज्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले़ लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा विचार न करता नव्या उमेदीने विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे़ राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्याचे सांगून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होत असल्याचे पवार म्हणाले़केंद्रातील सरकार हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असून, उद्योगपतीधार्जिणे आहेत़ वीजनिर्मितीसाठी कोळसा आयात करण्याचा सल्ला, गॅसअभावी दाभोळचा प्रकल्प बंद पडला आहे़ राज्य सरकारने तयार केलेल्या विकासाच्या योजनांबाबत केंद्र सरकार आकसबुद्धीने पाहत असून, या सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता जोमाने कामास सुरुवात केली पाहिजे़ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती वा जागावाटपांबाबत ज्येष्ठ नेते निर्णय घेतील़ मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे विचार, भूमिका व काम जनतेपर्यंत पोहोचून राज्यात पुन्हा आघाडी सरकारची सत्ता आणण्याचे आवाहनही पवार यांनी केले़सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, भाजपाच्या पाठीशी असलेल्या उद्योगपतींना ‘अच्छे दिन’ आले, तर शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़ कांदा निर्यातबंदी, युरियाची भाववाढ, मुंबई-पुणे रेल्वेचे काम बंद झाले, तर कुंभमेळ्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही़ नवीन निवडून गेलेल्या खासदारांनी याबाबत लोकसभेत प्रश्न मांडले नाहीत़ येत्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीचाच झेंडा विधानभवनावर असेल, असा आशावादही भुजबळ यांनी व्यक्त केला़यावेळी आमदार हेमंत टकले, कविता कर्डक, शोभा मगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केलेल्या कामांची माहिती दिली़ यावेळी व्यासपीठावर श्रीराम शेटे, देवीदास पिंगळे, उमेश पाटील, ए़ टी़ पवार, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, सुनील बागुल, नीलेश राऊ त, अर्जुन टिळे, नाना महाले, दिलीप बनकर आदिंसह मान्यवर उपस्थित होते़(प्रतिनिधी)