शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

लक्ष्याच्या जवळ : पावसाने दिली गती; वृक्षलागवडीत नाशिकची राज्यस्तरीय प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:09 IST

पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देवृक्षारोपण १कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३पर्यंत पोहचले.संततधारेमुळे मिळणार चांगले यशया महिनाअखेर लक्ष्य पूर्ण करण्याचा वनविभागाचा निर्धार

नाशिक : राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानात नाशिक जिल्ह्याला १ कोटी ९६लाख ३० हजार ५८१ रोपे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. यापैकी बुधवारी (दि.१४) सायंकाळपर्यंत जिल्ह्याचे वृक्षारोपण १कोटी ७७ लाख ७२ हजार ७६३पर्यंत पोहचले. जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असून यामहिनाअखेर लक्ष्य पूर्ण करण्याचा नाशिक वनविभागाचा निर्धार आहे.१ जुन ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन मंत्रालयाला राज्यभरात वनविभागासह अन्य यंत्रणांच्या माध्यमातून ५० कोटी वृक्ष लागवडीचा अखेरचा ३३ कोटींचा टप्पा पूर्ण करावयाचा आहे. या अभियानाचे हे शेवटचे वर्ष असून २०१६ साली २ कोटी वृक्ष लागवडीपासून या अभियानाला राज्यस्तरावर प्रारंभ केला गेला. याअंतर्गत यंदा नाशिक जिल्ह्याने पुन्हा आघाडी घेतली असून २२ दिवसांत ४३ टक्क्यापर्यंत जिल्ह्याला यश आले होते; मात्र त्यानंतर पावसाने अचानकपणे दडी मारल्यामुळे वृक्षारोपणाची स्थिती गंभीर बनली होती. परिणामी वृक्षारोपण जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खोळंबले होते. दडी मारल्यानंतर पंधरवड्यापासून पावसाने पुन्हा समाधानकारक हजेरी लावल्याने वृक्षारोपणालाही वेग आला. परिणामी नाशिक जिल्ह्याने ९०.५४ टक्क्यांपर्यंत वृक्षलागवडी यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली.या अभियानांतर्गत नाशिक वनविभागाला ८८ लाख १९ हजार ७३६, सामाजिक वनीकरण विभागाला २५ लाख तर वनविकास महामंडळाला १८ लाख ३४ हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी वनविभागाने ९४ तर वनविकास महामंडळाने ८२ टक्क्यांपर्यंत लागवड पूर्ण केली आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभाग मात्र पुढे असून या विभागाने उद्दिष्टापेक्षा पुढे जाऊन अद्याप २७ लाख ७८ हजार रोपे लावल्याचा दावा केला आहे.संततधारेमुळे मिळणार चांगले यशराज्यातील वृक्षाच्छादित जमिनींचे क्षेत्र वाढावे या उद्देशाने या अभियानाची सुरूवात राज्यस्तरावर केली गेली. याअंतर्गत लावलेल्या रोपांचे मोजमाप आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात केले जाते. यावेळी लावलेल्या रोपांपैकी जीवंत राहिलेल्या रोपांचे निरिक्षण नोंदविले जाते. यंदा पावसाने अचानक दडी मारल्यामुळे अभियान संकटात सापडले होते; मात्र पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग