शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

बंद करा प्रभाग समित्यांच्या सभा!

By admin | Updated: December 23, 2014 22:41 IST

सदस्यांचा उद्वेगजनक सवाल : ‘पूर्व’च्या सभेत अतिक्रमणावर चर्चा

इंदिरानगर : नगरसेवक आणि अधिकारी यांना काहीच अधिकार उरले नाहीत. सर्वाधिकार जर आयुक्तांनाच बहाल केले असतील तर प्रभाग समित्यांची सभा कशासाठी घ्यायच्या. त्यापेक्षा आयुक्तांच्याच दालनात दरमहा सभा बोलवा आणि प्रभाग सभा बंद करून टाका, असा उद्वेगजनक सवाल पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सभेत अतिक्रमणासह आरोग्य व पाणीपुरवठा या विषयावर जोरदार चर्चा होऊन सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती प्रा. कुणाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नेहमीप्रमाणे कोरमअभावी सभा एक तास उशिराने सुरू झाली. यावेळी प्रभागातील सभेत प्रस्ताव मांडून, चर्चा होऊनही कामे मार्गी लागत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. सर्वच अधिकार आयुक्तांनाच असतील तर यापुढे दर महिन्याची सभा आयुक्तांच्याच दालनात घेण्याची सूचनाही सदस्यांनी केली. दरम्यान, इंदिरानगरमधील रथचक्र चौकात गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुमारे १० ते १५ भाजीविक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. येत्या दोन दिवसांत भाजीविक्रेत्यांच्या विळख्यातून रथचक्र चौक मोकळा न केल्यास राजीव गांधी भवनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी दिला. विनायक खैरे यांनी अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. जुने नाशिकमधील रस्ते आणि नगरपालिकेच्या इमारतीभोवतालचे विक्रेत्यांना हटविण्याची सूचना केली तसेच रविवारी पाण्याचा टॅँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृह व लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याकडेही सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी ‘लोकमत’च्या सीएनएक्स पुरवणीत आलेला वृत्तांतही दाखविण्यात आला. नासर्डी नदीपात्र हे कचऱ्यासाठी कुंडच बनत चालल्याची तक्रार गुलजार कोकणी यांनी केली. यशवंत निकुळे यांनी सहा महिन्यांपासून साईनाथनगर चौफुली येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम ठप्प असल्याचे सांगितले. सदर साहित्य हे सिटी गार्डनमध्ये पडून असून, तातडीने सिग्नल यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्याची मागणीही निकुळे यांनी केली. यावेळी १२ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)