शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

हवामान बदलाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 15:04 IST

पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देयेवला परिसर : खरीपापाठोपाठ रब्बीही वाया जाण्याची भीती धुके, दवाबरोबरच पावसाच्या शिडकाव्याने शेतकऱ्यांची धाकधूक

पाटोदा ( गोरख घुसळे) : गेल्या सात-आठ दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, पहाटे पडणारे दाट धुके व दव तर आता दोन दिवसांपासून होणारा पावसाचा शिडकावा यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर परिणाम झाला असून द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान होत आहे. मन्यांना तडे जात असल्याने शेतकऱ्यांनी या अवकाळी पावसाचा धसका घेतला असून धाकधूक वाढली असून खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय ? अशी भीती सतावत आहे.दुष्काळी येवला तालुक्याला यावर्षी ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागला आहे. खरीप हंगाम चांगला आला, आता मुलांच्या शिक्षणाचा खर्च, मुलाबाळांची लग्ने व्यवस्थित पार पाडू अशी स्वप्ने मनाशी बाळगणाºया शेतकºयांचा परतीच्या अवकाळी पावसाने घात केला , आण िशेतकर्यांची स्वप्ने स्वप्न च राहिले ऐन पिके कापणी च्या सुमारास या अवकाळी पावसाने थैमान घालून होत्या चे नव्हते केले .यात खरीप हंगामातील सोयाबीन,मका,बाजरी,पोळ कांदा, कांदा रोपे शेतातच सडून गेल्या शेतकºयांचे नुकसान झाले . या दुख: तुन सावरून शेतकरी वर्गाने उधार उसनवारी करीत रब्बी हंगामातील गहू हरभरा, रांगडा कांदा, कांदा रोपे ,उन्हाळ कांदा या पिकांची पिकांची शेतात पेरणी केली ,पिकांची वाढ होत असतानाच पुन्हा या पिकांना ढगाळ हवामान,पहाटेचे दाट धुके व दविबंदू यांची नजर लागली आहे .त्यामुळे या पिकांवर मर,करपा,मावा अळी या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे, शेतकर्यांचे नकदी पीक असलेला कांदा रोगाचा सर्वाधिक बळी पडला असून त्याची संपूर्णपणे वाढ खुंटली आहे.तर कांदारोपे धुके दवाचे बळी ठरले .---------------------------भुरी,डावणी, मर रोगांचे अतिक्र मणअवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसला आहे, निम्यापेक्षा जास्त बागांना या वर्षी फळधारणा न झाल्याने शेतकर्यांचे लाखो रु पयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, आॅक्टोबर महिन्यानंतर ज्या काही थोड्या फार द्राक्ष बागा सुस्थितीत होत्या. त्या बागांवरही या वातावरणाने भुरी,डावणी, मर या रोगांनी अतिक्र मण केले असे असूनही शेतकरी वर्गाने विविध प्रकारचे महागडी औषधे व बुरशीनाशकांची फवारणी करून रोग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या तीनचार दिवसांपासून वातावरणातील बदलाने तसेच दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे द्राक्ष बागांवर पुन्हा संकट कोसळले आहे. तसेच द्राक्ष मणी तडकू लागल्याने आहे.---------------------------------महागड्या औषधांची फवारणीहवामान खात्यानेही पावसाची तसेच गारिपटीचा अंदाज वर्तिवला असल्याने शेतकरी वर्गाची धाकधूक वाढली असून त्याच्या डोक्यात चिंतेचे ढग घोंगावत आहे.वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील कांदा, कांदारोप,गहू , हरभरा, द्राक्ष बागा, डाळिंब बागा यांच्यावर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहे .त्यामुळे उत्पादन खर्चात चार ते पाच पटीने वाढ झाली आहे. असे असूनही सध्याच्या या वातावरणामुळे पिके वाया जाणार असल्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे.-----------------------------------------सततच्या वातावरणातील बदलामुळे पिके धोक्यात आली आहे ,पिकांवर रोगांचा प्रदूर्भाव वाढला आहे .औषध फवारणी करून रोगांवर नियंत्रण येण्याच्या वेळेस पुन्हा हवामानातील बदलाने पहिले पाढे पंचावन्न अशी गत झाली आहे. दोन दिवसांपासून परिसरात पावसाचा शिडकावा होत असल्याने धास्ती वाटत आहेजनार्दन भवर, द्राक्ष उत्पादक, , ठाणगाव

 

टॅग्स :Nashikनाशिक