शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हवामानातील बदलामुळे उसाला तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:42 IST

दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : उसाच्या वजनात घट होण्याची भीती

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.दिंडोरी तालुक्यात उसाच्या लागवडीखाली २६३८ हेक्टर क्षेत्र आहे. १० आॅक्टोबर २०१९ रोजी लागवड केलेला उसाचा प्लाट असून, तेरावा महिना संपत आला असतानाच उसाला तुरे निघाल्यामुळे वजनामध्ये एकरी एक टन घट येते अशी भीती शेतकरी शंकर कड यांनी व्यक्त केली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला २७५० रु पये दर नक्की केला असून, तुरे निघाल्यामुळे वजनाचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे ऊस उत्पादक सांगत आहेत. कारखान्याने तालुक्यातील उसाची तोड त्वरित सुरु करण्याची मागणीही जोर धरीत आहे.तालुक्यातील वातावरणातील बदलामुळे एका दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हवामानात सातत्याने बदल घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे. तसेच सध्या सकाळी धुके, दुपारी ऊन, व रात्री थंडी असे वातावरण तालुक्यात जवळपास सगळीकडेच आहे. यामुळे उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदाळे यांनी सांगितले. उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदाळे त्यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यात २६५ व ८६०३२ या उसाच्या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, उसलागवडीला एकरी ७० हजार रु पये खर्च येत असतो. त्यात उसाच्या बियाणासाठी पाच गुंठ्यांना ४५०० रु पये खर्च येत असल्याचे शंकर कड यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती