शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे उसाला तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 00:42 IST

दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : उसाच्या वजनात घट होण्याची भीती

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हवामानातील बदलामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या उसाला तुरे आले असून, यामुळे शेतकरी चिंतित आहे. तुऱ्यामुळे उसाच्या वजनामध्ये घट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.दिंडोरी तालुक्यात उसाच्या लागवडीखाली २६३८ हेक्टर क्षेत्र आहे. १० आॅक्टोबर २०१९ रोजी लागवड केलेला उसाचा प्लाट असून, तेरावा महिना संपत आला असतानाच उसाला तुरे निघाल्यामुळे वजनामध्ये एकरी एक टन घट येते अशी भीती शेतकरी शंकर कड यांनी व्यक्त केली आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला २७५० रु पये दर नक्की केला असून, तुरे निघाल्यामुळे वजनाचे नुकसान सहन करावे लागणार असल्याचे ऊस उत्पादक सांगत आहेत. कारखान्याने तालुक्यातील उसाची तोड त्वरित सुरु करण्याची मागणीही जोर धरीत आहे.तालुक्यातील वातावरणातील बदलामुळे एका दिवसात तीनही ऋतूंचा अनुभव मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून हवामानात सातत्याने बदल घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उसाची उत्पादकता कमी होत आहे. तसेच सध्या सकाळी धुके, दुपारी ऊन, व रात्री थंडी असे वातावरण तालुक्यात जवळपास सगळीकडेच आहे. यामुळे उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदाळे यांनी सांगितले. उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खतांची मात्रा शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदाळे त्यांनी केले आहे. दिंडोरी तालुक्यात २६५ व ८६०३२ या उसाच्या दोन जातींची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून, उसलागवडीला एकरी ७० हजार रु पये खर्च येत असतो. त्यात उसाच्या बियाणासाठी पाच गुंठ्यांना ४५०० रु पये खर्च येत असल्याचे शंकर कड यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती