शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जलदान विधी घाटाची स्वच्छता करावी

By admin | Updated: October 3, 2016 00:15 IST

दारणा घाटाची दुरवस्था : खड्डे बुजविण्याची मागणी

भगूर : येथील दारणा नदीकिनारी असलेल्या जलदान विधी घाटाची स्वच्छता करून त्या ठिकाणी असलेले खड्डे बुजवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दहा वर्षांपूर्वी भगूर नगरपालिकेने दारणा नदीकिनारी जलदान विधी घाट बांधला होता. मात्र या घाटाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्याने त्याठिकाणी अस्वच्छता वाढली आहे. भिकारी, जुगारी, मद्यपी आदिंचा त्या ठिकाणी सतत वावर असतो. जलदान विधी घाट व नदीकाठच्या पायऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता झाल्याने त्याठिकाणी विधी करण्यास येणाऱ्या कुटुंबीयांना स्वत: स्वच्छता करावी लागते. घाटाच्या पायऱ्यांलगत मोठा खड्डा निर्माण झाला असून, त्या ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला पायऱ्यावरून उतरून त्या डबक्यातून मार्ग काढावा लागतो. भगूर नगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलदान विधी घाट व पायऱ्यांची स्वच्छता करून त्या ठिकाणी असलेल्या मोठ्या खड्ड्यात भर टाकून तो खड्डा बुजवावा, तसेच १०-१५ दिवसांतून जलदान विधी घाटाची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)