शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

मीना वैशंपायन : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकट मुलाखत

नाशिक : लेखकावर कुठलेच बंधन नसले पाहिजे. बंधनामुळे विचार मारले जातात आणि विचार गेले की संस्कृती धोक्यात येते. दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ कागदोपत्री दिसते. मुळात लेखकांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून घेतला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पाळली जात नाही. मुक्त विचारानेच संस्कृतीची जपणूक होत असल्याने बिनधास्तपणे लिहा, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाच्या ४७ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.लिमये सभागृहात आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य स्वानंद बेदरकर यांनी घेतली. यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना डॉ. वैशंपायन यांनी सांगितले, संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय. बालपणीच माझ्यावर भाषांचा संस्कार होत गेला. त्यामुळे दुर्गा भागवतांवर संशोधन करताना साहित्यिक दृकप्रत्ययवादाचा अभ्यास करू शकले. त्यातून दुर्गाबार्इंचाही सहवास लाभला. स्वातंत्र्य हे मूल्य मानण्याची भावना त्यांनी माझ्यात जागृत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे, याचे भान त्यांनी दिले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांवरही मी लेखन केले. अनुवादाकडे वळले. अनुवाद ही सहजसाध्य कला नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अलीकडे कथा-कादंबरीत लयबद्ध लेखन होताना दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करत वैशंपायन म्हणाल्या, कथा-कादंबरीत विषयांची सर्वसमावेशकता नाही. त्यात भावनांची, विचारांची तीव्रता यायला हवी. कथा विसर्जित केली पाहिजे असे बिलकुल वाटत नसल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले. एशियाटिक लायब्ररीच्या वतीने संशोधकांसाठी नवनवीन दालने खुली करून देण्यात आली असून, तरुणांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)