शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

मीना वैशंपायन : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकट मुलाखत

नाशिक : लेखकावर कुठलेच बंधन नसले पाहिजे. बंधनामुळे विचार मारले जातात आणि विचार गेले की संस्कृती धोक्यात येते. दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ कागदोपत्री दिसते. मुळात लेखकांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून घेतला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पाळली जात नाही. मुक्त विचारानेच संस्कृतीची जपणूक होत असल्याने बिनधास्तपणे लिहा, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाच्या ४७ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.लिमये सभागृहात आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य स्वानंद बेदरकर यांनी घेतली. यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना डॉ. वैशंपायन यांनी सांगितले, संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय. बालपणीच माझ्यावर भाषांचा संस्कार होत गेला. त्यामुळे दुर्गा भागवतांवर संशोधन करताना साहित्यिक दृकप्रत्ययवादाचा अभ्यास करू शकले. त्यातून दुर्गाबार्इंचाही सहवास लाभला. स्वातंत्र्य हे मूल्य मानण्याची भावना त्यांनी माझ्यात जागृत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे, याचे भान त्यांनी दिले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांवरही मी लेखन केले. अनुवादाकडे वळले. अनुवाद ही सहजसाध्य कला नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अलीकडे कथा-कादंबरीत लयबद्ध लेखन होताना दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करत वैशंपायन म्हणाल्या, कथा-कादंबरीत विषयांची सर्वसमावेशकता नाही. त्यात भावनांची, विचारांची तीव्रता यायला हवी. कथा विसर्जित केली पाहिजे असे बिलकुल वाटत नसल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले. एशियाटिक लायब्ररीच्या वतीने संशोधकांसाठी नवनवीन दालने खुली करून देण्यात आली असून, तरुणांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)