शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विचारांमुळेच संस्कृतीची जपणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

मीना वैशंपायन : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकट मुलाखत

नाशिक : लेखकावर कुठलेच बंधन नसले पाहिजे. बंधनामुळे विचार मारले जातात आणि विचार गेले की संस्कृती धोक्यात येते. दुर्दैवाने आज अभिव्यक्ती स्वातंत्र्य केवळ कागदोपत्री दिसते. मुळात लेखकांनीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करून घेतला आहे. स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी पाळली जात नाही. मुक्त विचारानेच संस्कृतीची जपणूक होत असल्याने बिनधास्तपणे लिहा, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाच्या ४७ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष व ज्येष्ठ लेखक डॉ. मीना वैशंपायन यांनी प्रकट मुलाखतीत बोलताना केले.लिमये सभागृहात आयोजित जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. मीना वैशंपायन यांची मुलाखत वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य स्वानंद बेदरकर यांनी घेतली. यावेळी विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देताना डॉ. वैशंपायन यांनी सांगितले, संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय. बालपणीच माझ्यावर भाषांचा संस्कार होत गेला. त्यामुळे दुर्गा भागवतांवर संशोधन करताना साहित्यिक दृकप्रत्ययवादाचा अभ्यास करू शकले. त्यातून दुर्गाबार्इंचाही सहवास लाभला. स्वातंत्र्य हे मूल्य मानण्याची भावना त्यांनी माझ्यात जागृत केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची प्राणपणाने जपणूक केली पाहिजे, याचे भान त्यांनी दिले. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांवरही मी लेखन केले. अनुवादाकडे वळले. अनुवाद ही सहजसाध्य कला नाही. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. अलीकडे कथा-कादंबरीत लयबद्ध लेखन होताना दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करत वैशंपायन म्हणाल्या, कथा-कादंबरीत विषयांची सर्वसमावेशकता नाही. त्यात भावनांची, विचारांची तीव्रता यायला हवी. कथा विसर्जित केली पाहिजे असे बिलकुल वाटत नसल्याचेही वैशंपायन यांनी सांगितले. एशियाटिक लायब्ररीच्या वतीने संशोधकांसाठी नवनवीन दालने खुली करून देण्यात आली असून, तरुणांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)