शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
२६ पर्यटकांच्या हत्येचा बदला! सुरक्षा दलांनी पकडला दहशतवाद्यांना मदत करणारा आरोपी, ऑपरेशन महादेवला मिळालं यश
3
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
5
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
6
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
7
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
8
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
10
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
11
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
12
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
13
'परदेशी वस्तूंची खरेदी टाळा, विदेशी मॉडेल भारतासाठी धोकादायक', योगी आदित्यनाथ यांचे आवाहन 
14
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
15
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
16
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
17
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
18
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
19
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
20
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'

आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’चा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:26 IST

वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे.

नाशिक : वयाची पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर मूल दगावण्याचे प्रमाण जिल्ह्यातील आदिवासी भागातील तालुक्यांमध्ये आजही गंभीर आहे. आदिवासी तालुक्यांभोवती ‘सिकलसेल’ या अनुवांशिक आजाराचा फास दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. वाहक चाचणीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. नाशिक जिल्ह्यात दरमहा दोन ते तीन रुग्ण आढळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये या आजाराचे वाहकांचे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.  सिकलसेल ही एक रक्तव्याधी असून, तिचे संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते. या अनुवंशिक आजारावर औषधोपचार उपलब्ध आहे; मात्र अचूक व लवकर निदान होत नसल्यामुळे रुग्ण दगावतात. अचूक निदान न होण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे या व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये ठराविक लक्षणे दिसत नाही. राज्यातील ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्णांमधील आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेलचे प्रमाण आढळून येते. आदिवासी भागात या आजाराची पाळेमुळे रुजलेली आहे. शासनस्तरावर या आजारावर मात करण्यासाठी २००९ सालापासून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी वाहक चाचणीची व्याप्ती सरकारकडून वाढविली गेली पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  पेठ, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी यांसारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती आणि व्यापक वाहक चाचणीची आवश्यकता आहे. या आजाराविषयी नागरिकांमध्ये माहिती नसल्याने अनेकदा उपचारास विलंब होतो. आजाराची फारशी लक्षणे दिसत नाही. आदिवासी भागातील निरक्षरतेमुळे सिकलसेलचा फास आदिवासी लोकसंख्येभोवती अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे...तर आई-वडिलांपासून संक्रमणरक्तामधील हिमोग्लोबीन हे मुलाला आई-वडिलांकडून प्राप्त होते. एकाच प्रकारचे हिमोग्लोबीन आई-वडिलांकडून जनुकांद्वारे मुलाला मिळाल्यास अथवा दोघांपैकी एक सिकलसेल वाहक असल्यास मुलाला या अनुवंशिक रक्तव्याधीची लागण होऊ शकते. ज्या भागात हिवताप मोठ्या प्रमाणात आढळून येतो त्या भागातील रहिवाशांमध्ये सिकलसेलचा आजार वंशजात आढळतो.तांबड्या पेशींचा मृत्यूसिकलसेल आजार खरे तर अनेक व्याधींचा समुच्चय आहे. ही व्याधी असलेल्या रुग्णांना काही त्रास होत नाही; मात्र त्यांच्या रक्तामधील तांबड्या पेशी लवकर मृत होतात. परिणामी या पेशी रक्तवाहिन्यांमधून सहज प्रवाहित होत नाही व रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन शरीराच्या एखाद्या भागात तीव्र, मध्यम किंवा अतितीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवू शकतात. या वेदनांचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न असू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्य