शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
2
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
3
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
4
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
5
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
6
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
7
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
8
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
9
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
11
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
12
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
13
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
14
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
16
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
17
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
18
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
19
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
20
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?

त्रिशंकू जिल्हा परिषदेत सेनेचा सत्तेसाठी दावा

By admin | Updated: February 24, 2017 02:56 IST

निवडणुकीनंतर : भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

 श्याम बागुल नाशिकनाशिक : दीड दशक सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या जशा जागा घटल्या, तसेच कॉँग्रेसलाही मतदारांनी चौथ्या क्रमांकावर फेकत जिल्हा परिषदेत सेनेला सर्वाधिक जागा दिल्या खऱ्या; पण सत्ता स्थापनेसाठी भाजपाची मदत घेण्याची वेळ सेनेवर आणून ठेवल्याने आगामी पाच वर्षे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ खेळण्यास सर्वपक्षीयांना मुभा मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत १८ व एक अपक्ष पुरस्कृत मिळून १९ जागा होत्या. त्या जागांमध्ये सहाने वाढ होऊन यंदा २५ जागा झाल्या आहे. ‘मिशन- ४१’ प्लसचा नारा दिलेल्या भाजपाला मात्र अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तीन मंत्री व एक खासदार मैदानात उतरूनही भाजपाला ‘मिशन- ४१’ प्लस गाठता आले नाही. संघनात्मक पातळीवरील नादारीमुळे हे अपयश आले. शिवसेनेने तिकीट वाटपात नाशिक, निफाड व नांदगावला गडबड केल्याने शिवसेनेच्या जागा वाढू न शकल्याची जबाबदारी तिन्ही जिल्हाप्रमुखांवर येते. अर्थातच शिवसेना आपल्याशिवाय आहेच कोण याच अविर्भावात होती,त्याचाही फटका बसला. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात पाऊल ठेवू पाहणारे अजिंक्य हेमंत गोडसे व समीर हरिश्चंद्र चव्हाण या दोघा खासदारपुत्रांची पावले पदार्पणातच अडखळली आहेत. पाच वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था त्यामानाने एकटेपणाची होती. भुजबळ तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादीने जागा घटणार नाही याची काळजी घेत, निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्यांनाच उमेदवारी दिली होती.जिल्ह्यात सर्व प्रथम याच पक्षाने गटवार मेळावे घेतले होते. त्यामुळे पक्षाच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आठ जागा कमी होऊन १९ जागांवर समाधान मानावे लागले. चारवरून अकरापर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला मिनी मंत्रालयात ‘अच्छे दिन’ येणे अवघडच आहे. सेनेशी साथसंगत झाली तरच आणि तरच त्यांना सत्तेत सहभागी होता येईल, नाही तर मुंबईचा निकाल पाहता ‘मातोश्री’चा कल स्वबळावर लहान- मोठ्या पक्षांची जोडतोड करून आणि निवडून आलेल्या चार-दोन अपक्षांची मोट बांधून जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याकडे राहील, यात शंका नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच माकपाच्या सुरगाणा बाले किल्ल्याला राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाच्या अनोख्या रणनीतीने हट्टी गटात दणका बसला. सातत्याने सुरगाण्यावर वर्चस्व असलेल्या माकपाला त्यांच्या हक्काचा एक गट घालवावा लागला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढविली, त्यांच्या पदरात सात जागा मिळाल्या, त्या पक्षाच्या नव्हे तर त्या त्या उमेदवारांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणावी लागेल.