शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशंकू जिल्हा परिषदेत सेनेचा सत्तेसाठी दावा

By admin | Updated: February 24, 2017 02:56 IST

निवडणुकीनंतर : भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

 श्याम बागुल नाशिकनाशिक : दीड दशक सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या जशा जागा घटल्या, तसेच कॉँग्रेसलाही मतदारांनी चौथ्या क्रमांकावर फेकत जिल्हा परिषदेत सेनेला सर्वाधिक जागा दिल्या खऱ्या; पण सत्ता स्थापनेसाठी भाजपाची मदत घेण्याची वेळ सेनेवर आणून ठेवल्याने आगामी पाच वर्षे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ खेळण्यास सर्वपक्षीयांना मुभा मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत १८ व एक अपक्ष पुरस्कृत मिळून १९ जागा होत्या. त्या जागांमध्ये सहाने वाढ होऊन यंदा २५ जागा झाल्या आहे. ‘मिशन- ४१’ प्लसचा नारा दिलेल्या भाजपाला मात्र अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तीन मंत्री व एक खासदार मैदानात उतरूनही भाजपाला ‘मिशन- ४१’ प्लस गाठता आले नाही. संघनात्मक पातळीवरील नादारीमुळे हे अपयश आले. शिवसेनेने तिकीट वाटपात नाशिक, निफाड व नांदगावला गडबड केल्याने शिवसेनेच्या जागा वाढू न शकल्याची जबाबदारी तिन्ही जिल्हाप्रमुखांवर येते. अर्थातच शिवसेना आपल्याशिवाय आहेच कोण याच अविर्भावात होती,त्याचाही फटका बसला. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात पाऊल ठेवू पाहणारे अजिंक्य हेमंत गोडसे व समीर हरिश्चंद्र चव्हाण या दोघा खासदारपुत्रांची पावले पदार्पणातच अडखळली आहेत. पाच वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था त्यामानाने एकटेपणाची होती. भुजबळ तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादीने जागा घटणार नाही याची काळजी घेत, निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्यांनाच उमेदवारी दिली होती.जिल्ह्यात सर्व प्रथम याच पक्षाने गटवार मेळावे घेतले होते. त्यामुळे पक्षाच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आठ जागा कमी होऊन १९ जागांवर समाधान मानावे लागले. चारवरून अकरापर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला मिनी मंत्रालयात ‘अच्छे दिन’ येणे अवघडच आहे. सेनेशी साथसंगत झाली तरच आणि तरच त्यांना सत्तेत सहभागी होता येईल, नाही तर मुंबईचा निकाल पाहता ‘मातोश्री’चा कल स्वबळावर लहान- मोठ्या पक्षांची जोडतोड करून आणि निवडून आलेल्या चार-दोन अपक्षांची मोट बांधून जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याकडे राहील, यात शंका नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच माकपाच्या सुरगाणा बाले किल्ल्याला राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाच्या अनोख्या रणनीतीने हट्टी गटात दणका बसला. सातत्याने सुरगाण्यावर वर्चस्व असलेल्या माकपाला त्यांच्या हक्काचा एक गट घालवावा लागला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढविली, त्यांच्या पदरात सात जागा मिळाल्या, त्या पक्षाच्या नव्हे तर त्या त्या उमेदवारांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणावी लागेल.