शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

लोकन्यायालयात साडेचौदा हजार प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:06 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.

ठळक मुद्दे१३ हजार प्रलंबित प्रकरणे ; नागरिकांकडून न्यायनिवाड्याने समाधान

नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार शनिवारी (दि.१३) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जिल्हाभरात १४ हजार ७५७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामध्ये १२ हजार ४२७ दावे दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. वाद संपविण्याकरिता लोकअदालतीचा उपयोग करून घ्यावा, कारण लोकअदालीतमध्ये निकाली निघालेल्या प्रकरणांना अपील नसते आणि वाद संपुष्टात येतो. त्यामुळे अधिकाधिक पक्षकारांनी लोकअदालतीचा फायद्या घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले होते. लोकन्यायालयाच्या न्यायाने दोन्ही पक्षांना समाधान मिळाल्याचे यावेळी दिसून आले.जिल्हाभरातून प्रलंबित प्रकरणांपैकी १३ हजार ५४५ प्रकरणे अदालतीपुढे ठेवण्यात आली होती. तसेच दावापूर्व दाखल प्रकरणे १ लाख ६ हजार ७७५ होती. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी धनादेश न वटल्याने ८६८, फौजदारीची ८१८, बँकेची ६४, मोटार अपघात व नुकसानभरपाईची २०५, कामगारांची २, कौटुंबिक वादाची १३३, भूसंपादनाशी संबंधित ५, दिवाणी दावे २२७ व इतर २ अशा एकूण २ हजार ३३० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. राष्टÑीय लोकअदालतीसाठी प्राधिकरणचे सचिव प्रसाद पी. कुलकर्णी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज पार पडले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय