शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शहराचा पारा ३९ अंशांवर

By admin | Updated: May 7, 2017 01:18 IST

नाशिक : गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यावर्षीचा उन्हाळा नाशिककरांना चांगलाच तापदायक ठरत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून नाशिककरांना सलग तपमानाची चाळिशी अनुभवयास येत आहे. गेल्या शुक्रवारीही पारा ४१ अंशांवर पोहचला होता; मात्र शनिवारी (दि.६) नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळाला. पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात ३९ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद करण्यात आली.शहराच्या कमाल तपमानात आठवडाभरापासून सातत्याने वाढ होत होती. तपमानाचा पारा ३८अंशांच्या जवळपास फिरत होता. १ मे रोजी ३८.६ अंश इतके तपमान नोंदविले गेले होते. तेव्हापासून सातत्याने तपमानाचा पारा चढता राहिला आहे. यामुळे नाशिककरांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत असून, उन्हाळी सुटीचा कालावधी असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावर उष्म्याचा परिणाम होत आहे. पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.दीड दशकानंतर यावर्षी शहराच्या तपमानाचा पारा मार्च महिन्यामध्येच चाळिशीपार गेला होता. त्यामुळे नागरिक ांनी धास्ती घेतली होती. एप्रिल व मे महिन्यात पारा ४१ अंशांपर्यंत पोहचल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कमाल तपमानाबरोबरच किमान तपमानही वाढत असल्याने रात्रीदेखील वातावरणात उष्मा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना घरात बसणेही कठीण होत आहे. उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी वातानुकूलित यंत्रांचा वापरही वाढला आहे.