शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

शहराचा पाणीपुरवठा तोडणार

By admin | Updated: March 28, 2015 00:11 IST

पाटबंधारेची नोटीस : महापालिकेचा मात्र ‘दर वाद’ मिटल्याचा दावा

नाशिक : महापालिका आणि पाटबंधारे खात्यातील आर्थिक वाद शहरवासीयांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. महापालिकेने नऊ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविल्याचा आरोप करीत पाटबंधारे खात्याने ही रक्कम त्वरित न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, महापालिकेला थकबाकीची रक्कम अमान्य असून, त्यांनीच ७ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या चर्चेत हा वाद मिटला असल्याने त्यानुसार सुधारित देयके द्यावी, असे पत्र पाटबंधारे खात्याला दिले आहे.महापालिकेने नेहरू नागरी अभियानाअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी किकवी धरणाची मागणी केल्यापासून पाटबंधारे विभागाने अडवणूक करण्यास सुरुवात केली. या (अद्याप न बांधण्यात आलेल्या) धरणामुळे निर्माण झालेला पुनर्वसनाचा खर्च, धरणातून उपसा केलेले पाण्याच्या ६५ टक्के पाण्यावर प्रकिया करून ते पुन्हा नदीत न सोडणे, पिण्याच्या पाण्याचा औद्योगिक वापर अशा विविध कारणांखाली महापालिकेकडे तब्बल १५३ कोटी रुपयांची मागणी पाटबंधारे विभाग गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला पालिकेने वेळोवेळी उत्तर देऊन पाटबंधारेचे गणित कसे चुकीचे आहे हे स्पष्ट केल्याने ही रक्कम आता ५५ कोटी रुपयांवर आली आहे. तथापि, आता वर्षभरात महापालिकेने अतिरिक्त पाणी उचलले तसेच दारणा आणि गंगापूर धरणातील पाण्याचा औद्योगिक कारणासाठी वापर केला असा दावा करीत दंडात्मक रकमेसह साडेनऊ कोटी रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम त्वरित न केल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल आणि त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी महापालिकेवर राहील, असे नोटीस वजा पत्र महापालिकेस दिले आहे. मनपाचा वीस टक्के पाणीपुरवठा कमी करण्याचा इशाराही यात देण्यात आला आहे. पाटबंधारे खात्याच्या या पत्रामुळे महापालिकेची धावपळ झाली. मात्र या प्रकारात पालिकेचा दोष नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महापालिकेने पाटबंधारे खात्याला यासंदर्भात उत्तर दिले असून, वर्षभरात कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त उपसा गंगापूर आणि दारणा धरणातून झाला नसल्याचा दावा केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दारणा धरणातून, तर कोणत्याही प्रकारचा औद्योगिक वापर झाला नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे निरंक देयक होत आहे, तर गंगापूर धरणातील पाण्याबाबतही औद्योगिक वापर नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे सुधारित देयके पाठवावीत, असे पत्र पालिकेने दिले आहे. त्यामुळे शहराचा पाणी तोडण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचा महापालिकेचा दावा आहे. (प्रतिनिधी)