शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

शहराचा पाणीपुरवठा तोडणार

By admin | Updated: March 28, 2015 00:11 IST

पाटबंधारेची नोटीस : महापालिकेचा मात्र ‘दर वाद’ मिटल्याचा दावा

नाशिक : महापालिका आणि पाटबंधारे खात्यातील आर्थिक वाद शहरवासीयांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. महापालिकेने नऊ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविल्याचा आरोप करीत पाटबंधारे खात्याने ही रक्कम त्वरित न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, महापालिकेला थकबाकीची रक्कम अमान्य असून, त्यांनीच ७ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या चर्चेत हा वाद मिटला असल्याने त्यानुसार सुधारित देयके द्यावी, असे पत्र पाटबंधारे खात्याला दिले आहे.महापालिकेने नेहरू नागरी अभियानाअंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी किकवी धरणाची मागणी केल्यापासून पाटबंधारे विभागाने अडवणूक करण्यास सुरुवात केली. या (अद्याप न बांधण्यात आलेल्या) धरणामुळे निर्माण झालेला पुनर्वसनाचा खर्च, धरणातून उपसा केलेले पाण्याच्या ६५ टक्के पाण्यावर प्रकिया करून ते पुन्हा नदीत न सोडणे, पिण्याच्या पाण्याचा औद्योगिक वापर अशा विविध कारणांखाली महापालिकेकडे तब्बल १५३ कोटी रुपयांची मागणी पाटबंधारे विभाग गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला पालिकेने वेळोवेळी उत्तर देऊन पाटबंधारेचे गणित कसे चुकीचे आहे हे स्पष्ट केल्याने ही रक्कम आता ५५ कोटी रुपयांवर आली आहे. तथापि, आता वर्षभरात महापालिकेने अतिरिक्त पाणी उचलले तसेच दारणा आणि गंगापूर धरणातील पाण्याचा औद्योगिक कारणासाठी वापर केला असा दावा करीत दंडात्मक रकमेसह साडेनऊ कोटी रुपयांची मागणी केली आणि ही रक्कम त्वरित न केल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल आणि त्यामुळे जनक्षोभ निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी महापालिकेवर राहील, असे नोटीस वजा पत्र महापालिकेस दिले आहे. मनपाचा वीस टक्के पाणीपुरवठा कमी करण्याचा इशाराही यात देण्यात आला आहे. पाटबंधारे खात्याच्या या पत्रामुळे महापालिकेची धावपळ झाली. मात्र या प्रकारात पालिकेचा दोष नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.महापालिकेने पाटबंधारे खात्याला यासंदर्भात उत्तर दिले असून, वर्षभरात कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त उपसा गंगापूर आणि दारणा धरणातून झाला नसल्याचा दावा केला आहे. ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या बैठकीत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दारणा धरणातून, तर कोणत्याही प्रकारचा औद्योगिक वापर झाला नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे निरंक देयक होत आहे, तर गंगापूर धरणातील पाण्याबाबतही औद्योगिक वापर नसल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे सुधारित देयके पाठवावीत, असे पत्र पालिकेने दिले आहे. त्यामुळे शहराचा पाणी तोडण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचा महापालिकेचा दावा आहे. (प्रतिनिधी)