शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वडाळा रस्त्यावर धावली शहर बस...

By admin | Updated: September 12, 2015 23:15 IST

अनवधान : बस दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या

नाशिक : पालिका हद्दीतील वडाळागावात गेल्या पंधरा वर्षांपासून बससेवा बंद पडली आहे. मात्र, आज अचानकपणे दुपारच्या सुमारास वडाळागावच्या रस्त्यावरून शहर बस जात असल्याचे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या.वडाळागाव हे पालिका हद्दीमधीलच. शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पंधरा वर्षांपासून बंद पडलेली शहर बससेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. हे एकमेव असे गाव आहे जेथे एस.टी. पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थी वर्गाची दिवसेंदिवस मोठी गैरसोय होत आहे. मात्र महामंडळाला अद्याप या गावासाठी बससेवा सुरू करण्याचा ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने कुंभमेळ्यामध्येही वडाळा बससेवेपासून वंचित होता. आज (दि.१२) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास चक्क वडाळा रस्त्यावरून शहर बस गावाकडे येत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नागजीमार्गे निमाणीवरून सुटलेली दुपारी बारा वाजेची पाथर्डीगाव बस ही वडाळा-इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरून जाण्याऐवजी शिवाजीवाडी येथून वडाळा रस्त्याने थेट वडाळागाव चौफुलीपर्यंत आली. वाहनचालकाच्या अनवधानामुळे का होईना; मात्र अनेक वर्षांनंतर वडाळा रस्त्यावर यानिमित्ताने ग्रामस्थांना ‘एसटी’चे दर्शन घडले. (प्रतिनिधी)शहर बससेवेची उणीवगाव झपाट्याने विकसित झाले असून, एखाद्या महामार्गाला लाजवेल, असा या गावाचा रस्ता वर्षभरापूर्वी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. अशोका मार्ग कॉर्नरपासून तर थेट वडाळागाव परिसरापर्यंत नवनवीन कॉलन्या उदयास आल्या आहेत. लोकवस्ती वाढत आहे. वडाळागावाची लोकसंख्याही पंधरा वर्षांपूर्वीच्या तुलनेत साहजिकच वाढली आहे. त्यामुळे या गावाला शहर बससेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून केले जात आहे.