शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

शहर बस बंद, प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 01:58 IST

(मालिका एसटी) नाशिक शहरात कोरोनामुळे आधीच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनांची संख्या कमी त्यात कोणी दुचाकीवर बसवायला आणि लिफ्ट देण्यासही तयार ...

ठळक मुद्देरिक्षावर भर: शेअर व्हेईकलचा प्रयोग, कोरोनाकाळातही संकट

(मालिका एसटी)

नाशिक शहरात कोरोनामुळे आधीच प्रवासी वाहतुक करणा-या वाहनांची संख्या कमी त्यात कोणी दुचाकीवर बसवायला आणि लिफ्ट देण्यासही तयार नाही अशा स्थितीत बस बंद असल्याने नागरीकांना रिक्षा, टॅक्सी भाड्यासाठी मोठा भूर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे हे सर्व एसटी बसचे हक्काचे प्रवासी आहेत.शहरात कितीही खासगी प्रवासाची साधने वाढली असली तरी एसटी बसचा वापर करणारा देखील एक वर्ग आहे. हा कष्टकरी कामगार वर्ग आहे. तसेच विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग देखील आहे. विशीष्ट वेळेला बस उपलब्ध होते त्यामुळे हा वर्ग हक्काचा प्रवासी आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानकाहून निघाल्यानंतर देखील अनेकांना अगदी पंचवटी, सातपूर, गंगापूर अशा सर्व ठिकाणी जाण्यासाठी बस प्रवास स्वस्त आणि रास्त प्रवासाचे साधन बस हेच आहे. मात्र, त्यांचे देखील हाल होत आहेत.शहरातून जरा लांब जायचे तर दोन ते तीन वेळा रिक्षा बदलाव्या लागतात. सध्या तर ज्यांना रिक्षा शक्य नाही अशांनी खासगी प्रवासी साधने शेअरींगने नेणे सुरू केले आहेत. तथापि, केवळ बस सुरू नसल्याने कोरोना काळात नागरीकांना हा धोेका पत्कारावा लागत आहे.मी आरटीओ एजंट म्हणून काम करतो. लहवीतहून थेट आरटीओत जावे लागते. बस सेवा बंद असल्याने अडचण येत आहे. यापूर्वी पन्नास ते शंभर रूपयांचा खर्च येत असे. आता सव्वाशे ते दीडशे रूपये खर्च होतात आणि वेळही खूप लागतो.- सुदाम शिंदे, लहवीत.मी त्रिमुर्ती चौकातून व्दारका येथे नोकरीवर जाते. परंतु बस बंद असल्याने त्रिमुर्ती चौकातून त्र्यंबक नाका आणि तेथून मग व्दारका येथे जावे लागते.त्यामुळे रिक्षाचा खर्च खूपच होतो. पूर्वी एसटी बसमुळे सोय होत होती.- निलीमा जगदाळे, सिडको.बस बंद असल्याने सध्या केवळ आॅटो रिक्षाचाच सहारा आहे. मात्र शेअर रिक्षात जाण्यास अडचण येथे फिजीकल डिस्टसिंगचे पालन होत नसल्याने भीती वाटते. बसमध्ये बसताना किमान अशी भीती वाटणार नाही. - इश्वर पाटील, इंदिरा नगर.मुळातच कोरोना संकट काळाच्या अगोदरच महामंडळाने इंदिरा नगर परीसरातील बस फे-या कमी केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरीकांचे हाल होत होते. आता तर बस सेवा सर्व बंद आहेत, आणि दुसरीकडे सर्व काही अनलॉक होत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा विचार करायला हवा.- सिध्देश झाजडे, राजीव नगर.बस बंद असल्याने कामगारांना अंबड तसेच सातपूर औद्योगिक वसाहतीत ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे .रिक्षाने प्रवास करताना दुप्पट भाडे द्यावे लागत असल्याने कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे लवकरात लवकर शहर वाहतूक बस सुरू करणे गरजेचे आहे .-निलेश मगर ,कामगार, सिडको.शहर वाहतूक बस व्यवस्था बंद असल्याने रक्षाचालकांकडून अधिक भाडे आकारले जात आहे. त्यांना प्रवासी मर्यादा घालून दिल्याने त्यांचीही अडचण आहे. आधीच आहे त्या पगारात घर भागवणे कठीण झाले असताना कामावर जाताना लागणारे भाडे यातच निम्पा पगार संपून जात असल्याने कामगारांवर आर्थिक संकट ओढवले आहे.- अविनाश निकम, सिडको. 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स