शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात उष्णतेने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 18:33 IST

पाटोदा : तीन दिवसांपासून पाटोदा आणि परिसरात सूर्य आग ओकत असून तपमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून लग्न समारंभातील उपस्थितीवरही परिणाम दिसून येत आहे.

पाटोदा परिसरात पारा ४३ अंशावर गेल्याने भरदुपारच्या सुमारास सर्वत्र अघोषित संचारबंदी लागावी तसे रस्ते निर्मनुष्य दिसून येत आहेत. प्रचंड उन्हामुळे जीवाची काहिली होत असल्याने नागरिकांनी थंडपेयांच्या तसेच रसवंतीगृहाचा आसरा घेतला आहे. हवामान खात्यानेही चार पाच दिवस उष्णतेची लाट सांगितलेली असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक दक्ष झाले आहेत. रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या टोप्या विक्र ीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. नागरिकांचा गॉगल, टोप्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शरीराला गारवा निर्माण करणाऱ्या द्राक्ष, टरबूज, काकडी या फळांना मागणी वाढली आहे. विविध प्रकारचे ज्यूस, ताक, लस्सी अशा थंडपेयांनादेखील मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यातही तपमान ४० अंशाच्या पुढे गेले होते.मात्र मधल्या काही दिवसात पारा हा ३७-३८ अंशाच्या खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र तीन दिवसांपासून पुन्हा पारा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असल्यामुळे नागरिक उकाड्यापासून सुटका करण्यासाठी झाडाची सावली तसेच पंखा व कुलरचा आधार घेतांना दिसत आहेत. शुक्रवार व शनिवारी दिवसभर वीज पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नाजरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पाटोदा परिसरात तपमान ४३ अंशाच्या पुढे गेल्याने सकाळी सात आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके लागत असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाºया नागरिकांना टोपी, गॉंगल्स तसेच महिलांना स्कार्प व सनकोट घेतल्याशिवाय घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दिवसाबरोबरच रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिकांना बाहेर हवेत बसावे लागत आहे. रात्रीच्या वेळेस डासही प्रचंड त्रास देत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे नागरिकांच्या डोळ्यांच्या विकारामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.नागरिकांना डोळे येणे, डोळे कोरडे पडणे, डोळे लाल होणे, अलर्जी होणे असे असा त्रास होत आहे. माणसांबरोबरच मुक्या प्राण्यांनाही या उष्णतेचा त्रास होत असून त्यांना विविध आजार जडले आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात