शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

नागरिकत्व कायद्यास आव्हान देणार :तिस्ता सेटलवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 01:07 IST

सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ हा देशाच्या सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वाविरोधी आहे तसेच देशात धार्मिक भेदभावास खतपाणी घालणारा आहे. सुधारित कायद्यात सुस्पष्टता नसल्याने घुसखोरांच्या नावाखाली देशातील मुस्लिमांना लक्ष्य करणारा आहे. याबाबत देशात जनजागृती करीत त्याचा प्रखर विरोध करणार असल्याचे प्रतिपादन मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केले.

ठळक मुद्देभेदभावास खतपाणी घालण्याचा प्रयत्न

मालेगाव मध्य : सुधारित नागरिकत्व कायदा २०१९ हा देशाच्या सर्वधर्मसमभाव या मूलभूत तत्त्वाविरोधी आहे तसेच देशात धार्मिक भेदभावास खतपाणी घालणारा आहे. सुधारित कायद्यात सुस्पष्टता नसल्याने घुसखोरांच्या नावाखाली देशातील मुस्लिमांना लक्ष्य करणारा आहे. याबाबत देशात जनजागृती करीत त्याचा प्रखर विरोध करणार असल्याचे प्रतिपादन मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केले.कम्युनिटी कोआॅर्डिनेशन इनिशिएटिव्ह (सीसीआय) व खातून एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे राष्टÑीय अध्यक्ष प्रा. अब्दुल मजीद सिद्दिकी, खातून एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रिजवान शेख, अ‍ॅड. इरफाना हमदानी उपस्थित होत्या.देशात घुसखोरांची संख्या किती आहे. याची निश्चित आकडेवारी कुठल्याही यंत्रणेकडे नाही. याबाबत सरकारी यंत्रणांमध्ये एकमतनाही.मूठभर नागरिकांसाठी संपूर्ण देशवासीयांना त्यात ओढणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत याबाबत जनजागृती करीत या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे सेटलवाड यांनी शेवटी सांगितले.प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नतिस्ता सेटलवाड म्हणाल्या की, सदर कायद्याने देशात प्रथमच नागरिकांना जातीच्या आधारावर वेगळे करण्याचे काम केले आहे. शेजारील देशातील घुसखोर व शरणार्थी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे ते तिन्ही मुस्लीम देश आहेत. यावरून सरकारची नीती स्पष्ट होते. देशातील अर्थव्यवस्था, बेरोजगारी, शिक्षण अशा प्रमुख मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करून जातीय भेदभाव पसरवित सत्ता भोगणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.

टॅग्स :MalegaonमालेगांवSocialसामाजिकPoliticsराजकारण