शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वीज वाहीनीमुळे टाकेद परिसरात नागरीक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 20:05 IST

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

ठळक मुद्देसर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.

सर्वतीर्थ टाकेद : परदेशवाडी सब स्टेशनसाठी घोटी येथून येणाऱ्या तीस ते चाळीस वर्षा पुर्वीच्या वीज वाहक तारांमध्ये वारंवार दोष निर्माण होत असल्याने ईगतपुरी तालुक्याचा पुर्व भाग सतत अंधारात राहात आहे. या साठी सर्व लाईन बदलून ही लाईन रस्त्यांच्या कडेने टाकण्याची मागणी परिसरातून होत आहे.तीस ते चाळीस वर्षा पुर्वी भंडारदरा येथे तयार केलेली जल विद्युत बोरटेंभा (ईगतपुरी) येथील सब स्टेशनमध्ये वाहून आणण्यासाठी तेहतीस के. व्ही. विद्युत वाहीनी टाकलेली आहे. या वेळी १९८८ ते १९९० च्या दरम्यान परदेशवाडी येथे तालुक्याच्या पुर्व भागासाठी तेहतीस के. व्ही. उपकेंद्र सुरू केले. या उप केंद्रासाठी याच वाहीनीवरून विद्युत पुरवठा करण्यात आला.सदरची वाहीनी वैतारणा वाहीनीसाठी फायद्याची व्हावी म्हणून खंबाळे परीसरातून ही वाहीनी घेण्यात आली. यामुळे कुठेही दोष निर्माण झाल्यास बागायती शेती, दारणा नदीचे विस्तीर्ण पात्र या मुळे रात्री अपरात्री वाहीनीतील दोष काढण्यासाठी खुप त्रास होत असतो. त्यामध्ये जुनाट लोखंडी पोल, जुनाट विजवाहक तारा, खराब झालेले स्टे, चिनमातीच्या चिमण्या ह्या वारंवार खराब होत आहेत. काही तुटत आहेत. यामुळे कायम परदेशवाडी उप केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत होत असतो.चार फीडर पैकी टाकेद फिडर वरील विद्युत वाहीनी ही सुमारे सत्तर कि. मी. लांबीची या परिसरात पसरलेली आहे. या फिडरचा लोड ही १९० पर्यंत जात असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण जास्त तर असतेच पण या वाहीनीवर ७६ जनित्र आहेत. यामध्ये अधरवड, टाकेद खुर्द, टाकेद बुद्रुक, अडसरे बुद्रुक व खुर्द व त्यांच्या वाड्या अशा सुमारे वीस गाव व वाड्यांचा समावेश आहे.या सर्व बाबींचा विचार करून टाकेद ते परदेशवाडी ही स्वतंत्र विद्युत वाहीनी टाकण्याची सतत मागणी होत आहे. या मुळे विद्युत दाबाचे नियंत्रण ही होईल. या बाबतचा सात कि. मी. अंतराचा स्वतंत्र वाहीनीचा प्रस्ताव घोटी ग्रामीण विभागाने पाठविल्याचे समजते. याबाबत लोकप्रतिनिधींनी योग्य तो पाठपुरवठा करावा अशी ग्रामस्थ करीत आहेत.