शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
7
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
8
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
9
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
10
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
11
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
12
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
13
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
14
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
15
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
16
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
17
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
18
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
20
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

गंगापूररोडवर मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:18 IST

गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते.

गंगापूर : गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या मोकाट जनावरांमुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याकडे संबंधित विभाग कानाडोळा करून वेळ ढकलून नेत असल्याचे दिसते. गेल्या काही वर्षांपासून कोंडवाडे नामशेष होत चालले असून, शहरात व ग्रामीण भागात मोकाट जनावरांचा वावर आणि उपद्रव वाढला आहे. याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.शहरी व ग्रामीण भागात पशुधन मोठ्या प्रमाणात असल्याने मोकाट जनावरे बाजारपेठेत व मुख्य रस्त्याच्या मधोमध बसत असल्याने नागरिकांना आपली वाहने चालवणे मोठ्या जिकिरीचे झाले आहे. गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर, गंगापूर, गोवर्धन या ठिकाणी रस्त्यावर मोकाट जनावरे बसल्याने रस्त्यावरील वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. जोपर्यंत एखादा अपघात होत नाही तोपर्यंत त्यांचे मालक अदृश्य असतात. दरम्यान एखाद्या वाहनाने या जनावरांना गाडीने उडवले तर सर्व अदृश्य झालेले मालक आपला दावा दाखविण्यासाठी व भांडण करण्यासाठी नेहमी तयार असतात. महापालिका अथवा गोवर्धन ग्रामपंचायत या जनावरांना पकडून कोंडवाड्यात सोडण्याची व मालकांना दंड करण्याची तसदीसुद्धा घेत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. जनावरांनी रस्त्यावर टाकलेल्या विष्ठेवरून दुचाकी वाहने घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नाशिक महापालिका या घटनांकडे सरार्सपणे दुर्लक्ष करत आहे. या मोकाट जनावरांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती करावी. मोकाट जनावरांना या कोंडवाड्यात ठेवून त्यांच्या मालकांवर दंड आकारणी करावी, अशी मागणी गंगापूररोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.गंगापूररोड, आनंदवली, सोमेश्वर या भागात रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरे घोळका करून बसतात अन् तिथेच घाण करतात. परिणामी वाहनचालकांना आपली वाहने हळू चालवावी लागतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात रोज घडतात. महापालिकेने यावर त्वरित कारवाई करायला हवी.- अरु ण पाटील, रहिवासीमोकाट जनावरांवर वेळीच कारवाई करायला हवी. जनावरे रस्त्याच्या मधोमध बसल्याने आणि तिथेच घाण केल्याने दुचाकीचालक व चारचाकी चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होतो, त्यामुळे या मोकाट जनावरांवर व त्यांच्या मालकांवर कारवाई करावी.- सुरेश गायकवाड, आनंदवली

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा