शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

आधार केंद्र बंदमुळे नागरिकांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:28 IST

अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

नाशिक : अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अन्य केंद्रांवर अशीच परिस्थिती असून, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.  केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आला असून, बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, गॅस एजन्सी, आयकर, विक्रीकर आदी खात्यांमध्ये आधार क्रमांकाशिवाय कोणतेही काम शक्य नसल्याने ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही अशा नागरिकांची व ज्यांनी यापूर्वी आधारकार्ड काढले परंतु आता त्याचे अपडेशन नसल्याने त्यांना पुन्हा आधार काढण्याची वेळ आली आहे. त्यातच शासनाने आधारकार्ड सेंटर महाआॅनलाइनशी जोडल्यामुळे तर खासगी आधार केंद्रे बंद करण्यात आली आहेत. शासनाकडून पुरविण्यात आलेल्या अधिकृत यंत्रावरच आधारकार्डची नोंदणी केली जात असून, नाशिक जिल्ह्याच्या एकूण मागणीचा विचार करता त्यामानाने सुरू केलेली केंद्रे अपुरी पडत आहेत.  गेल्या आठवड्यात आधार केंद्रांबाबत होणारी नागरिकांची ओरड लक्षात घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकाºयांसमवेत बैठक घेऊन नवीन आधार केंद्रे सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या व जिल्हाधिकाºयांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून सोमवारपासून १४ नवीन केंद्रे सुरू करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही.  खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे मंगळवारी दिवसभर सुरूच होऊ शकली नाही. शनिवार ते सोमवार लागोपाठ तीन दिवस शासकीय सुट्या असल्यामुळे सदरचे आधार केंद्र बंद होते. गेल्या आठवड्यात आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांनी सकाळी ९ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती; परंतु केंद्र सुरूच होऊ शकले नाही. प्रशासनाचा दावा फोल; अनेक केंद्रे बंद असल्याची नागरिकांची तक्रार यूआयडीने सदर केंद्राला सर्व्हिस दिली नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले व थोड्या वेळात चालू होईल असे सांगून वेळ मारून नेण्यात आली.  सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन्ही केंद्रे सुरू होऊ शकली नाहीत. पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्नही फसल्याने अखेर नागरिकांना माघारी फिरावे लागले.  शहरातील अन्य आधार केंद्रांचीही अशीच अवस्था असून, १७ केंद्रे सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी, त्यातील अनेक केंद्रे बंदच असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक