शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:20 IST

नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देआॅफलाइन काम करण्याचा सल्लासर्व्हरचा प्रश्न निर्माण

नाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.