शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
2
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
3
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
4
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
5
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
6
मयंतीची पँट नेहमी मी घातलो, आज तू का घातलीस? Live शोमध्ये गावस्करांनी विचारला मिश्किल प्रश्न, मग...  
7
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
8
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
9
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
10
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
11
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
12
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
13
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
14
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
15
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
16
Jyoti Malhotra : "माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
17
लष्कर जंग जंग पछाडतंय, पण महिना झाला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी का सापडत नाही आहेत? ही आहेत कारणं
18
INDvENG: वासिम जाफरने इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यासाठी निवडला भारताचा संघ; कर्णधार कुणाला केलं पाहिलंत का?
19
हा विकृतपणा अन् नीचपणाचा कळस,अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजेत;उदय सामंत यांची संतप्त भावना
20
Government Jobs: सरकारी नोकरी आणि पगार जवळपास २ लाख रुपये; एमपीएससीकडून भरतीची घोषणा!

फेरीवाल्यांकडील चिरीमिरीतून मनपाला मिळतात ४० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 16:52 IST

नाशिक- महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखून देखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरीत करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमीरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. एका बिगाऱ्याला दहा लाख रूपये तर माजी वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच ४० लाख रूपये जमा होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी समितीच्या शनिवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत केला. या प्रकरणी सभापती उध्दव निमसे यांनी चौकशीचे आदेश देतानाच या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचेही आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देनगरसेवक दिनकर पाटील यांचा आरोपसभापतींनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक- महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखून देखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरीत करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमीरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. एका बिगाऱ्याला दहा लाख रूपये तर माजी वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतच ४० लाख रूपये जमा होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी समितीच्या शनिवारी (दि.१८) झालेल्या बैठकीत केला. या प्रकरणी सभापती उध्दव निमसे यांनी चौकशीचे आदेश देतानाच या विभागातील कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचेही आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अयशस्वी ठरलेली फेरीवाला क्षेत्र आणि रस्त्यावरील वाढते अतिक्रमण या विषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी दिनकर पाटील यांनी फेरीवाला क्षेत्र असतानाही सोयीच्या ठिकाणी व्यवसाय करू देण्यासाठी मोठ्या प्रमाणात माया जमा केली जात आहे. एका शिपायी जर दहा लाख रूपये जमा करीत असेल त्याची बदली कोण कशी काय करेल असा प्रश्न केला. आपल्या प्रभागात शंभर फुटी मार्गावर वाहतूकीचा विचार न करता त्यावर मच्छी मार्केट आणि अन्य दुकाने थाटली असून ती जाणिवपूर्वक हटविली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर कल्पना पांडे यांनी आपल्या प्रभागातील अतिक्रमणांचा मुद्दा मांडताना प्रशासनाला कळवूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप केला. संगिता जाधव यांनी देखील पाथर्डी फाटा येथील अतिक्रमीत बाजाराचा प्रश्न मांडला तर सुषमा पगारे यांनी आपल्या प्रभागातील विक्रेत्यांना उपनगर येथे जागा देण्यात आली असून तो नाशिकरोड विभागात असल्याने फेरीवाला क्षेत्र विकसीत करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. समीर कांबळे यांनी आपल्या प्रभागात तिबेटीयन मार्केट तसेच डॉन बॉस्को रोड येथील खाऊ गल्ली हे विक्रेते स्थलांतराचे यशस्वी प्रयोग राबविल्याचे सांगितले.

अतिक्रमण निर्मुलन उपआयुक्त राहूल पाटील यांनी शहरात ५६ फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले असून ८० टक्के फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यात आल्याचे नमूूद केले. शालीमार आणि मेनरोड येथील विक्रेत्यांच्या स्थलांतरासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे दोन बैठका झाल्याचे सांगितले. सभापती उध्दव निमसे यांनी सदस्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे महामार्ग आणि रहदारीचे रस्ते सोडून अन्यत्र फेरीवाला क्षेत्र करावेत, ज्या ठिकाणी व्यवसाय होईल अशाच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र करावे त्यासाठी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार