शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

चणकापूर, अर्जुनसागरमधून नदीपात्रात विसर्ग

By admin | Updated: July 17, 2017 00:43 IST

कळवण : चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाणी वाढत असल्याने चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.  कळवण शहरासह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, ओव्हरफ्लो झालेल्या चणकापूरमधून ३००० क्यूसेसने गिरणा नदीपात्रात, तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून २००० क्यूसेसने नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे, तर चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेसने पूरपाणी सोडण्यात आले आहे. गेल्या गुरु वारी १२५.७९ मिमी, शुक्र वारी १५८.७० मिमी, तर शनिवारी गेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी १७६.६ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले .  चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात २९७ मिमी पाऊस पडला असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात ४०० मिमी पाऊस पडला. चणकापूरमध्ये ११४० दशलक्ष घनफूट (४३ टक्के), तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात ६५० दशलक्ष घनफूट (४९ टक्के) जलसाठा झाला आहे. चणकापूर व अर्जुनसागर प्रकल्पाचे गेट उघडे असल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा, पुनंद तसेच बेहडी नदी खळखळून वाहू लागली आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचे संकेत दिले आहेत. कळवण शहर व तालुक्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे चांगला पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असून, कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून, बांध फुटले आहे, तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. १५ आॅगस्टपर्यंत चणकापूरसह अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाचे गेट उघडे राहणार असल्याने पावसाचे पूरपाणी शेकडो क्यूसेसने नदीपात्रातून वाहत असल्याने पूरपाण्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, महसूल प्रशासनाने नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने यंदा वरुणराजाची मेहेरबानी चांगली राहील अशी आशा सर्वांना होती. त्यावेळी तालुक्यात ५५ ते ६० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने त्यानंतर दडी मारल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतातुर झाला होता. मात्र तीन-चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच तालुक्यातील नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत.