शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

चणकापूर, अर्जुनसागरमधून नदीपात्रात विसर्ग

By admin | Updated: July 17, 2017 00:43 IST

कळवण : चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात व कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाणी वाढत असल्याने चणकापूर व अर्जुनसागर ( पुनंद) प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले आहे.  कळवण शहरासह तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली असून, ओव्हरफ्लो झालेल्या चणकापूरमधून ३००० क्यूसेसने गिरणा नदीपात्रात, तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून २००० क्यूसेसने नदीपात्रात विसर्ग होत असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत चालली आहे, तर चणकापूर प्रकल्पातून चणकापूर उजव्या कालव्यात ५० क्यूसेसने पूरपाणी सोडण्यात आले आहे. गेल्या गुरु वारी १२५.७९ मिमी, शुक्र वारी १५८.७० मिमी, तर शनिवारी गेल्या २४ तासांत तालुक्यात सरासरी १७६.६ मिमी पाऊस पडला असल्याचे सूत्रांनी सांगितले .  चणकापूर प्रकल्प लाभक्षेत्रात २९७ मिमी पाऊस पडला असून, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प लाभक्षेत्रात ४०० मिमी पाऊस पडला. चणकापूरमध्ये ११४० दशलक्ष घनफूट (४३ टक्के), तर अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पात ६५० दशलक्ष घनफूट (४९ टक्के) जलसाठा झाला आहे. चणकापूर व अर्जुनसागर प्रकल्पाचे गेट उघडे असल्याने गिरणा व पुनंद नदीपात्रात हजारो क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा, पुनंद तसेच बेहडी नदी खळखळून वाहू लागली आहे.चणकापूर व अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून, हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पुन्हा पावसाचे संकेत दिले आहेत. कळवण शहर व तालुक्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे चांगला पाऊस पडल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला असून, कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचले असून, बांध फुटले आहे, तर रस्ते उखडून गेल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. १५ आॅगस्टपर्यंत चणकापूरसह अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पाचे गेट उघडे राहणार असल्याने पावसाचे पूरपाणी शेकडो क्यूसेसने नदीपात्रातून वाहत असल्याने पूरपाण्यामुळे नदीपात्रालगत असलेल्या गावांचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून, महसूल प्रशासनाने नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने यंदा वरुणराजाची मेहेरबानी चांगली राहील अशी आशा सर्वांना होती. त्यावेळी तालुक्यात ५५ ते ६० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने त्यानंतर दडी मारल्याने तालुक्यातील बळीराजा चिंतातुर झाला होता. मात्र तीन-चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या पावसामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसेच तालुक्यातील नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत.