शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

चिंचखेडच्या शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 17:19 IST

पाटील गेल्या सहा दिवसांपासून होते बेपत्ता

ठळक मुद्देपालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील दत्तात्रेय देवराम पाटील या शेतक-याचा मृतदेह पालखेड डाव्या कालव्यातील पाण्यात आढळून आला. पाटील गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान, कर्जाला कंटाळूनच पाटील यांनी आपले जीवन संपविल्याची चर्चा आहे.दत्तात्रेय पाटील हे गेल्या शनिवार (दि.२४) पासून घरातून बेपत्ता झाले होते. पाटील यांच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची तक्र ार दाखल केली होती. तसेच व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देखील पाटील यांच्या फोटोसह माहिती देण्यात आली होती.अखेर गुरु वारी (दि.२९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास पालखेड डावा कालव्याच्या पाण्यामध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह अडकलेल्या अवस्थेत कालव्या जवळील राहणाऱ्यांना नागरिकांना दिसून आला. परंतु मृतदेह पाण्यात असल्याने ओळख पटत नव्हती. अथक प्रयत्नानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असता बेपत्ता असलेले चिंचखेडचे पाटील यांचाच मृतदेह असल्याचे आढळून आले. पाटील यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्यांच्यावर बँक आॅफ इंडियाचे २५ लाख रु पयांचे कर्ज होते. त्यांना काही दिवसांपूर्वी बँकेतून फोनही येत होते, सततची नापिकी आणि वाढत चाललेला कर्जाचा डोंगर त्यामुळे बँकेचे कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी नैराश्यातून पालखेड डावा कालवा मध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले जाते. दरम्यान, वणी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या