शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

लहान मुलांमध्ये डेंग्यूसह चिकुनगुनिया रुग्ण वाढले; ओपीडीतही मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये ...

नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार वाढले असून, बहुतांश बालरोगतज्ज्ञांच्या नियमित ओपीडीतही ऑगस्टच्या प्रारंभापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेषत्वे डेंग्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक बालकांना रुग्णालयात ॲडमिट करण्याचीही वेळ येते.

डेंग्यू हा आजार ‘डेंग्यू व्हायरस’ या आरएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो. अशा व्यक्तीला जेव्हा इडिस डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. सुमारे ४ ते ७ दिवसांनंतर या व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात. डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. त्यानंतर पहिले ३-४ दिवस ताप येतो. ४-५ दिवसांनी अंदाजे ६० टक्के लोकांना अंगावर पुरळ उठते ते गोवरासारखे दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो. सर्वसाधारणपणे ९५ टक्के रुग्णांना इतपतच त्रास होतो आणि पुढील ३-४ दिवसांमध्ये पुष्कळसे बरे वाटून दोन आठवड्यांत तो पूर्ववत दैनंदिन कामकाजास सुरुवात करू शकतो. मात्र, केवळ १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार तापानंतर ५ व्या दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

इन्फो

डेंग्यूची शंका असल्यास चाचणी आवश्यक

डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्लू, सर्दी, मलेरिया, टायफाॅइड आदींसारखाच तो वाटतो, म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्तचाचण्या कराव्या लागतात. डेंग्यूच्या गंभीर लक्षणांमध्ये प्रामुख्याने कातडीवर रक्ताळलेले पुरळ, रक्तस्राव, झोप जास्त येणे, भ्रम, दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी, सूज, शरीर थंड पडणे- रक्तदाब कमी होणे या बाबींचा त्यात समावेश आहे.