शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

लहान मुलांमध्ये डेंग्यूसह चिकुनगुनिया रुग्ण वाढले; ओपीडीतही मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये ...

नाशिक : जिल्ह्यात पावसाने संततधार कायम ठेवल्याने एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे लहान मुलांमध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार वाढले असून, बहुतांश बालरोगतज्ज्ञांच्या नियमित ओपीडीतही ऑगस्टच्या प्रारंभापासून लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. विशेषत्वे डेंग्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेक बालकांना रुग्णालयात ॲडमिट करण्याचीही वेळ येते.

डेंग्यू हा आजार ‘डेंग्यू व्हायरस’ या आरएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हा विषाणू रुग्णाच्या रक्तात सर्वदूर संचार करीत असतो. अशा व्यक्तीला जेव्हा इडिस डासाची मादी चावते, त्या वेळेला हे जंतू तिच्या शरीरात प्रवेश करतात. मादीमध्ये ८ ते ९ दिवस या जंतूंची प्रचंड वाढ होते- डासाला त्यापासून काहीही अपाय होत नाही. अशी मादी जेव्हा पुढील निरोगी व्यक्तीला चावते त्या वेळेला तिच्या लाळेतून हे विषाणू पुढील व्यक्तीमध्ये संक्रमित होतात आणि त्याला डेंग्यूची लागण होते. सुमारे ४ ते ७ दिवसांनंतर या व्यक्तीमध्ये या आजाराची लक्षणे दिसू लागतात. डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. त्यानंतर पहिले ३-४ दिवस ताप येतो. ४-५ दिवसांनी अंदाजे ६० टक्के लोकांना अंगावर पुरळ उठते ते गोवरासारखे दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो. सर्वसाधारणपणे ९५ टक्के रुग्णांना इतपतच त्रास होतो आणि पुढील ३-४ दिवसांमध्ये पुष्कळसे बरे वाटून दोन आठवड्यांत तो पूर्ववत दैनंदिन कामकाजास सुरुवात करू शकतो. मात्र, केवळ १ ते ५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार तापानंतर ५ व्या दिवसापासून गंभीर स्वरूप धारण करू शकतो.

इन्फो

डेंग्यूची शंका असल्यास चाचणी आवश्यक

डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्लू, सर्दी, मलेरिया, टायफाॅइड आदींसारखाच तो वाटतो, म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्तचाचण्या कराव्या लागतात. डेंग्यूच्या गंभीर लक्षणांमध्ये प्रामुख्याने कातडीवर रक्ताळलेले पुरळ, रक्तस्राव, झोप जास्त येणे, भ्रम, दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी, सूज, शरीर थंड पडणे- रक्तदाब कमी होणे या बाबींचा त्यात समावेश आहे.