शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका रिक्त

By admin | Updated: March 30, 2015 00:37 IST

शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा : शहरात म्हाडाची ८२ घरे पडून

नाशिक : राज्य शासनाने कमाल जमीनधारणा कायदा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा स्वेच्छाधिकार कोटा रद्द केला; परंतु यादरम्यान या कोट्यासाठी राखीव असलेल्या सदनिकांबाबत निर्णय न घेतल्याने शेकडो सदनिका वापराविना पडून आहे. केवळ नाशिक शहरातच म्हाडाची ८२ घरे रिकामी पडून आहेत. त्यातच न्यायालयाने अलीकडेच या कायद्यानुसार विकासकान दिलेल्या कमिटमेंट बदलता येणार नसल्याचा निकाल गेल्या जानेवारीत दिल्याने आता शासनच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.गरिबांना माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याचाच एक भाग म्हणून जमीन खरेदीवर मर्यादा घालणारा कायदा करण्यात आला. त्यातही अशा प्रकारची कमाल धारणा कायद्याअंतर्गत असलेल्या जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प राबविले तर त्यातील दहा टक्के सदनिका राखीव ठेवणे बंधनकारक होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारात अशा सदनिका पत्रकार, कलावंत, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ता यांना दिल्या जात होत्या. तथापि, नागरी कमाल जमीन धारणा कायदा कितपत उपयुक्त ठरला यावर बराच खल झाला आणि अखेरीस हा कायदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना रद्द झाला. अर्थात, त्यानंतरदेखील कायदा रद्द होण्यापूर्वी विकासकांनी शासनाला कबूल केल्याप्रमाणे त्यांना सदनिका हस्तांतरित कराव्या लागल्या होत्या. त्याबाबतदेखील निर्णय झालेला नाही. आता कमाल जमीन धारणा कायदा रद्द झाल्यानंतरदेखील राज्यशासनाचा ताबा असलेल्या अनेक मिळकती वापराविना पडून आहेत. गरिबांना घरे मिळण्यासाठी आता एक एकरपेक्षा अधिक जागेत गृहनिर्माण प्रकल्प राबविला जात असेल तर त्यातील २० टक्केसदनिका किंवा जागा म्हाडाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात अनेक सुधारणा सुचविल्या गेल्या असल्या तरी यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकार कोट्यात असलेल्या सदनिकांचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.म्हाडाच्या वतीने नाशिकमध्ये अशा प्रकारच्या ८२ सदनिका वापराविना पडून आहेत. त्याबाबत शासनाने अद्याप निर्णय दिलेला नाही. म्हाडाच्या मुख्याधिकारी सरिता नरके यांनी त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे वापरात नसलेल्या या सदनिकांचे काय करायचे असा प्रश्न सध्या पडला आहे. असाच प्रश्न खासगी विकासकांसमोरही उभा आहे. के्रडाईचे माजी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी नाशिकमध्ये हा प्रश्न फारसा गंभीर नसून तथापि, मुंबई आणि पुण्यात मात्र हा प्रश्न आहे. नागरी जमीन कमालधारणा मर्यादेच्या कलम २० अन्वये विकासकाने कबूल केलेल्या अटीनुसार अशा प्रकारच्या सदनिका सरकारच्या ताब्यात असून, त्यावर सरकारनेच निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे सांगितले. तर क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण यांनी राज्यातील नवे सरकार याबाबत निर्णय घेतील या विषयी विकासकांना अपेक्षा असल्याचे नमूद केले. (प्रतिनिधी)